मुख्यमंत्र्यांसाठी चक्क डिव्हायडर तोडला!

पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.


राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार व सभा होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी मंत्री संदिपान भुमरे यांनी सुरू केली आहे.


चिकलठाणा विमानतळावरून बीड बायपास मार्गे नव्या सोलापूर-धुळे महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणकडे रवाना होणार आहे. परंतु या रोडवर दुभाजक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांचा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. ज्या पैठण तालुक्यात एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे, त्या पैठणमध्ये शिंदे गटाकडून दौऱ्याच्या निमित्ताने नियोजन बैठका घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण असलेल्या सर्वच प्रमुख गावात शिंदे गटाचे महत्वाचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका