नवी मुंबई (प्रतिनिधी) : पालिकेने स्वच्छ अभियान अंतर्गत ओला व सुका कचरा वाहतुकीसाठी यंत्रणा निर्माण केली आहे. परंतु या यंत्रणा मध्ये समाविष्ट असलेल्या कचरा वाहतूक करणारी वाहने जीर्ण झाली असून वाहनात असलेले घाण पाणी चक्क रस्त्यावर पडत आहे. याचा अनुभव नवी मुंबईकराना आला. सुका कचरा वाहतुकीसाठी आणलेल्या आरसी वाहनातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी पडत असल्याने त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एजी इनव्हायरो या नावाच्या ठेकेदाराकडे पालिकेच्या हद्दीत निघालेल्या कचऱ्याचे निर्यात करण्याचा ठेका सात वर्षांपूर्वी दिला आहे. ताफ्यात उपलब्ध असणाऱ्या कचरा वाहतुकीची ५८ वाहन खराब झाली आहेत. त्यामुळे वाहांनाच्या ज्या ठिकाणी कचरा गोळा करून क्षेपणभूमी मध्ये नेले जाते त्या ठिकाणी छिद्र पडल्याने कचऱ्यात असलेला घाण पाणी रस्त्यावर पडत असल्याचे दृश्य नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
नवी मुंबई प्रशासनाकडून सध्या सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्याचे अभियान जोरदारपणे चालू आहे. नियमित कचरा उचलणाऱ्या काही वाहनांना मध्ये बदल करून काही वाहने ही ओला तर काही वाहने सुका कचरा उचलतात. त्यामुळे सुका कचरा उचलणारी वाहने असली तरी त्या मधून घाण पाणी बाहेर पडत आहे.
नादुरुस्त झालेल्या वाहना विषयी तत्काळ सबंधित ठेकेदारास कळविले जाईल.तसेच तत्काळ वाहने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले जातील. -डॉ.बाबसाहेब राजळे, उपायुक्त, पालिका.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…