चार महिन्यात १२३० प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या गाड्यांची चेन ओढण्याच्या घटना

डोंबिवली (वार्ताहर) : गेल्या चार महिन्यात १२३० प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या गाड्यांची चेन ओढण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान साडेसात लाखांपेक्षा अधिक दंडही वसूल करण्यात आला आहे.


रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, अनेकदा प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी कारणांसाठी करत असल्याचेही दिसून आले आहे. यात एप्रिल ते जुलाई या चार महिन्यांच्या कालावधीत अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराची १२३० प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे ११४३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७.५९ लाख- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही तर त्या ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात. तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.


अशा अवास्तव अलार्म चेन पुलींग घटनांवर मध्य रेल्वे बारीक लक्ष ठेवून आहे. यात एप्रिल ते जुलाई २०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १२३० प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे ११४३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७.५९ लाख- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


दरम्यान प्रवाशांनी अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर करू नये ज्यामुळे उर्वरित प्रवाशांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचे आवाहनही रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत जमिनीखाली १८ मीटर खोलवर भुयारी मेट्रोला मिळणार बीएसएनएलचे नेटवर्क ?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही दिवसांपूर्वी जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड या भुयारी मेट्रो

भांडुप उषा नगर नाल्यावरील पुलांची कामे धिम्या गतीने, पण खर्च वाढला एवढा

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप येथील उषा नगर नाल्यावरील जुन्या पुलांचे बांधकाम पाडून

स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी कंत्राट संपुष्टात,पण मुदत वाढीला तारीख पे तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची

वाहतूक कोंडी संपणार?

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाला गती मुंबई  : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन जोडमार्ग

कलिना आणि वांद्रे, पूर्व विधानसभा क्षेत्र भाजपला अनुकूल

आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलतांना उत्तर पूर्व जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे सांगतात, राजकारणात यायचे असा

आजपासून धारावीकरांसाठी विशेष मोहीम

प्रलंबित सर्वेक्षणात भाग घेता येणार १५ नोव्हेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार मुंबई  : विविध अन्य कारणांमुळे