वैमानिकांच्या संपामुळे जगभरातील ८०० उड्डाणे रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मन विमान कंपनी लुफ्थान्सा एअरलाइनने वैमानिकांच्या एकदिवसीय संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचा गोंधळ झाला. या संपामुळे जगभरातील ८०० उड्डाणे रद्द केल्याचे समजते. भारतात दिल्लीच्या विमानतळावर दोन विमाने रद्द करावी लागली. त्यामुळे ७०० प्रवासी अडकले होते.


शुक्रवारी पहाटे उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर ७०० प्रवासी अडकले होते. या प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. लुफ्थान्सा एअरलाइनची दिल्लीहून फ्रँकफर्टची दुपारी २.५० वाजता आणि म्युनिकची दुपारी १.१० वाजताची विमाने रद्द करावी लागली.


पहिल्या विमानासाठी ३०० तर दुसऱ्यासाठी ४०० प्रवासी प्रतीक्षेत होते. लुफ्थान्साने गुरुवारी सांगितले की, त्यांची जगभरातील ८०० उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. यामुळे जगभरातील १.३० लाख प्रवाशांवर परिणाम होणार आहे. लुफ्थान्साकडे ५ हजार वैमानिक आहेत. ५.५ टक्के वेतनवाढीची त्यांची मागणी आहे.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'