वैमानिकांच्या संपामुळे जगभरातील ८०० उड्डाणे रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मन विमान कंपनी लुफ्थान्सा एअरलाइनने वैमानिकांच्या एकदिवसीय संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचा गोंधळ झाला. या संपामुळे जगभरातील ८०० उड्डाणे रद्द केल्याचे समजते. भारतात दिल्लीच्या विमानतळावर दोन विमाने रद्द करावी लागली. त्यामुळे ७०० प्रवासी अडकले होते.


शुक्रवारी पहाटे उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर ७०० प्रवासी अडकले होते. या प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. लुफ्थान्सा एअरलाइनची दिल्लीहून फ्रँकफर्टची दुपारी २.५० वाजता आणि म्युनिकची दुपारी १.१० वाजताची विमाने रद्द करावी लागली.


पहिल्या विमानासाठी ३०० तर दुसऱ्यासाठी ४०० प्रवासी प्रतीक्षेत होते. लुफ्थान्साने गुरुवारी सांगितले की, त्यांची जगभरातील ८०० उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. यामुळे जगभरातील १.३० लाख प्रवाशांवर परिणाम होणार आहे. लुफ्थान्साकडे ५ हजार वैमानिक आहेत. ५.५ टक्के वेतनवाढीची त्यांची मागणी आहे.

Comments
Add Comment

Gujrat Viral Video : काळ आला होता पण वेळ...गुजरातच्या वलसाडमधील लिफ्टचा भीषण अपघात; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.