चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धीपूरला मराठी भाषा विद्यापीठ होणार : देवेंद्र फडणवीस

नाशिक (प्रतिनिधी) : आम्हाला ज्यांनी भाषा दिली, भाषेचे ज्ञान दिले, इतके मोठे मोठे ग्रंथ ज्यांनी आम्हाला दिले. त्या चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झाले पाहिजे ही मागणी अतिशय योग्य मागणी आहे, असून लवकरच योग्य ती पाऊले उचलून ही मागणी पूर्णत्वास नेली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर कालपासून तीन दिवसीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी उपस्थिती दिली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले मध्यंतरीच्या काळात शासनाने आम्ही मुंबईला मराठी विद्यापीठ करू सांगितले, मात्र मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, पण ज्या ठिकाणी मराठीच्या पहिल्या ग्रंथाला जन्म घेतला. त्या ठिकाणी मराठीतली पहिली कविता गायली गेली. ज्या ठिकाणी मराठीतले साडेसहा हजार ग्रंथ तयार झाले. ज्या ग्रंथांनी संपूर्ण भारतामध्ये अटकेपार मराठीचा झेंडा रोवला. त्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ झाले पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा केली असून लवकरच यावर सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय करून हेच मी आपल्याला यानिमित्ताने खर म्हणजे सांगणार आहे.


श्री चक्रधर स्वामींनी दत्तवादी तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आणि त्यानुसार त्यांनी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर असे चार नित्य आणि अनादीचे पदार्थ आहेत, हे प्रतिपादन आपल्यासमोर केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मगाशीरचा उल्लेख झाला, पहिल्यांदा आपण महाराष्ट्र आज म्हणतो पण पहिल्यांदा महाराष्ट्री असावे असे वचन म्हणणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते, आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून ही आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला प्रगट करणारे चक्रधर स्वामी होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने 'जे जैसे असे ते तसे जाणिजे त्यानं' असे निरूपण करून खऱ्या ज्ञानाची परिभाषा आपल्यासमोर सांगितली आणि विशेषता अहिंसेचा पुरस्कार करत हिंसा पाप पाप पावन नर्क अशा प्रकारचे वचन देऊन आपल्या सर्वांमध्ये अहिंसेचा एक भाव हा या ठिकाणी जागृत केला. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर चक्रधर स्वामींनी जनमानसात प्रबोधन केल्याचे फडणवीसांनी सांगितले.


महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचे सरकार


गेल्या दोन अडीच वर्षात रिद्धीपूर येथील विकास आराखड्याला निधी मिळालेला नाही, पण आता आपल्या महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचा सरकार या ठिकाणी आहे. त्यामुळे रिद्धपूर विकास आराखड्याला निश्चितपणे निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महानुभाव पंथाचे जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या स्थळे, स्थान आहेत. ते स्थान पुन्हा महानुभाव पंथाला परत मिळाले पाहिजे. या दृष्टीने लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या ठिकाणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे या संदर्भातल्या सगळ्या सूचना देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.

Comments
Add Comment

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात