पालघरमध्ये फुलबाजार महागला; फुलांच्या किंमतीत ४० टक्क्य़ांनी वाढ

  146

पालघर (प्रतिनिधी) : यंदा सण उत्सवाचे दिवस आले असून बाजारपेठाही सजल्या आहेत. नूकतेच गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून आरस तसेच मंडप सजावटीसाठी फुलांची मागणी वाढली आहे. मात्र हवामान बदल आणि कोरोनामध्ये बंद असलेला व्यवसाय यामुळे फुल मार्केटला याचा फटका बसला होता. तर वसई, विरार, पालघर पट्ट्यात फुलांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यांनाही मागील दोन वर्षांपासून नुकसानाला सामोरे जावे लागले होते.


यंदा मात्र फुल मार्केट बहरले असून मागणीत देखील वाढ झाली आहे. मात्र यंदा सर्वच वस्तू महाग झाल्याने फुलांच्या किमती देखील वधारल्या आहेत. यामध्ये तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


विरार भागातील पश्चिम पट्टय़ात मोठ्या प्रमाणात फूल बागायतींची शेती केली जाते. या बागांमध्ये फुलणारी फुले येथील शेतकरी व व्यावसायिक मुंबईच्या दादर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. दररोज या भागातून एक हजाराहून अधिक किलो फुलांचा माल विक्रीसाठी जात असतो. सणासुदीच्या काळात या भागातील फुलांना दादर येथील फुलबाजारात मोठी मागणी असते. यात मोगरा, चाफा, झेंडू, जास्वंद, शेवंती, गुलाब अशा विविध फुलांचा समावेश आहे. मागील दोन वर्षे करोनाचे संकट असल्याने हवी तशी बाजारपेठ मिळाली नव्हती. यंदा सर्व निर्बंध शिथिल झाले असल्याने बाजारपेठाही बहरल्या असल्याचे फूल व्यावसायिकांनी सांगितले आहे.


गणेशोत्सवात देवाला वाहण्यासाठी, तोरण व इतर सजावटीसाठी फुलांचा वापर होतो. त्यामुळे बाजारात दोन ते तीन दिवसांपासून फुलांची मागणी वाढली असल्याने त्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. अडीचशे ते तीनशे रुपये किलोने विक्री केला जाणारा मोगरा हा पाचशे ते सहाशे रुपये किलोने विक्री होऊ लागला आहे.


श्रावण महिन्यात असे वाटले होते फुलांना चांगला भाव मिळेल, परंतु त्या वेळीही फुलांचे बाजारभाव हे कमीच होते. आता गणेशोत्सव असल्याने दोन दिवसांपासून फुलांचे भाव वाढत असल्याचे फूल व्यावसायिक अतुल म्हाले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Uday Samant: राज्यातील सर्व मॉल्सनी अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण न केल्यास त्यांचे वीज आणि पाणी तोडणार; मंत्री उदय सामंत यांचा इशारा

मुंबई: मुंबईतील लिंक स्क्वेअर मॉल (२९ एप्रिल २०२५) व ड्रीम मॉलमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये केवळ गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई: बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध

ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या

भाजपा आमदार किसन कथोरेंच्या बंगल्याबाहेर गोळीबार

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाला. या गोळीबारात

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई