रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू युद्ध जिंकण्यासारखे अशी प्रवाशांची भावना होती. तिकीट खिडकी उघडताच काही सेकंदांत जागा फुल्ल होणे, दलालांचा सॉफ्टवेअरद्वारे गैरवापर आणि सामान्य प्रवाशांची निराशा या सगळ्यावर आता रेल्वेने थेट घाव घातला आहे. ‘डिजिटल हॅकर्स’ना पूर्णपणे रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ई-तिकीट प्रणालीत आतापर्यंतची सर्वात कडक सुरक्षा योजना लागू केली आहे.


रेल्वे बोर्डाच्या नव्या निर्देशांनुसार, आगाऊ आरक्षण कालावधीत म्हणजे प्रवासाच्या ६० दिवस आधी तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी संपूर्ण नियंत्रण आधार-सत्यापित आयआरसीटीसी खात्यांनाच दिले जाणार आहे. पूर्वी आधारची अट काही मिनिटांपुरती मर्यादित होती, मात्र आता ही मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आता तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांपर्यंत म्हणजे १२० मिनिटे नॉन-व्हेरिफाइड खाती बुकिंग करू शकणार नाहीत. एवढेच नव्हे, तर बुकिंगच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत फक्त आधारशी लिंक आणि सत्यापित खातीच तिकिटे बुक करू शकतील. हा आदेश १८ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.


हा कठोर निर्णय का? कारण तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल बनावट आयडी आणि ऑटोमेशन सॉफ्टवेअर वापरून काही सेकंदांत हजारो तिकिटे बुक करत होते. आधार लिंकिंगमुळे एका व्यक्तीची खात्रीशीर ओळख पटणार असून, बल्क बुकिंगवर प्रभावी आळा बसणार आहे.


या बदलाचा थेट फायदा सामान्य प्रवाशांना होणार आहे. सणासुदीला किंवा सुट्ट्यांमध्ये महिने आधी नियोजन करणाऱ्यांना आता दलालांऐवजी थेट प्रणालीतून कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. मात्र प्रवाशांसाठी एक स्पष्ट इशारा आधारशिवाय प्रवेश नाही.


तुमचे आयआरसीटीसी खाते आधारशी प्रमाणित नसेल, तर बुकिंगच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना केवायसी आणि आधार लिंक तत्काळ पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

Vijay and Sangeetha Divorce : 'थलापती' विजय यांच्या संसाराचे वादळ शमले; पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

तामिळनाडू : अभिनेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेला

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही

Redmi Note 17 5G Launched : Redmi Note 17 5G भारतात लाँच; ८०००mAh ची तगडी बॅटरी अन् ५०MP कॅमेरा, पाहा किमतीसह सर्व फीचर्स!

नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून