रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू युद्ध जिंकण्यासारखे अशी प्रवाशांची भावना होती. तिकीट खिडकी उघडताच काही सेकंदांत जागा फुल्ल होणे, दलालांचा सॉफ्टवेअरद्वारे गैरवापर आणि सामान्य प्रवाशांची निराशा या सगळ्यावर आता रेल्वेने थेट घाव घातला आहे. ‘डिजिटल हॅकर्स’ना पूर्णपणे रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ई-तिकीट प्रणालीत आतापर्यंतची सर्वात कडक सुरक्षा योजना लागू केली आहे.


रेल्वे बोर्डाच्या नव्या निर्देशांनुसार, आगाऊ आरक्षण कालावधीत म्हणजे प्रवासाच्या ६० दिवस आधी तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी संपूर्ण नियंत्रण आधार-सत्यापित आयआरसीटीसी खात्यांनाच दिले जाणार आहे. पूर्वी आधारची अट काही मिनिटांपुरती मर्यादित होती, मात्र आता ही मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आता तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांपर्यंत म्हणजे १२० मिनिटे नॉन-व्हेरिफाइड खाती बुकिंग करू शकणार नाहीत. एवढेच नव्हे, तर बुकिंगच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत फक्त आधारशी लिंक आणि सत्यापित खातीच तिकिटे बुक करू शकतील. हा आदेश १८ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.


हा कठोर निर्णय का? कारण तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल बनावट आयडी आणि ऑटोमेशन सॉफ्टवेअर वापरून काही सेकंदांत हजारो तिकिटे बुक करत होते. आधार लिंकिंगमुळे एका व्यक्तीची खात्रीशीर ओळख पटणार असून, बल्क बुकिंगवर प्रभावी आळा बसणार आहे.


या बदलाचा थेट फायदा सामान्य प्रवाशांना होणार आहे. सणासुदीला किंवा सुट्ट्यांमध्ये महिने आधी नियोजन करणाऱ्यांना आता दलालांऐवजी थेट प्रणालीतून कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. मात्र प्रवाशांसाठी एक स्पष्ट इशारा आधारशिवाय प्रवेश नाही.


तुमचे आयआरसीटीसी खाते आधारशी प्रमाणित नसेल, तर बुकिंगच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना केवायसी आणि आधार लिंक तत्काळ पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.