सतर्क राहून गणेशोत्सव साजरा करा : डॉ. भारती पवार

नाशिक (प्रतिनिधी) : नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करतांना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करून गणरायाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घेत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे सांगून संबंधित विभागांनी रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत डॉ. पवार बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिकचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दूरवस्था त्यात निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध असलेल्या निधीमधून तत्काळ रस्ते दुरूस्तीची कामे मार्गी लावावीत. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे दर्जेदार असावीत. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा पुरवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.


जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे चांगल्या दर्जाची होण्यासोबतच वेळेत पूर्ण करण्यात यावीत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील कामे करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेवून कामे करण्यावर भर द्यावा, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमीनींचे पंचनामे करतांना कोणीही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांमुळे काही ठिकाणी एस.टी. बसेस जाणे शक्य होत नाही. तेथे महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने एस.टी. सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर योजनेंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या ७५ अमृत सरोवरांपैकी ४७ सरोवरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या सरोवरांपैकी ४ ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांनी केलेल्या कामाची माहिती सादर केली.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा मंजूर; मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

- लव्ह जिहाद रोखण्यासाठी 'धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६'वर मंत्रिमंडळाची मोहर मुंबई : बहुप्रतिक्षित धर्मांतर

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष