सतर्क राहून गणेशोत्सव साजरा करा : डॉ. भारती पवार

Share

नाशिक (प्रतिनिधी) : नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करतांना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करून गणरायाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घेत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे सांगून संबंधित विभागांनी रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत डॉ. पवार बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिकचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दूरवस्था त्यात निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध असलेल्या निधीमधून तत्काळ रस्ते दुरूस्तीची कामे मार्गी लावावीत. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे दर्जेदार असावीत. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा पुरवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे चांगल्या दर्जाची होण्यासोबतच वेळेत पूर्ण करण्यात यावीत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील कामे करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेवून कामे करण्यावर भर द्यावा, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमीनींचे पंचनामे करतांना कोणीही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांमुळे काही ठिकाणी एस.टी. बसेस जाणे शक्य होत नाही. तेथे महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने एस.टी. सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर योजनेंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या ७५ अमृत सरोवरांपैकी ४७ सरोवरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या सरोवरांपैकी ४ ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांनी केलेल्या कामाची माहिती सादर केली.

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

1 hour ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

3 hours ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

3 hours ago