तानसा अभयारण्यात चार पर्यटन केंद्र होणार विकसित

Share

शहापूर (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील संपन्न निसर्गसंपदा दिवसेंदिवस पर्यटकांना आकर्षित करत असून दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा व भातसा परिसरात वाढत आहे. त्यातच मुंबईपासून केवळ हाकेच्या अंतरावरील या ठिकाणांना पर्यटकाकडून चांगलीच पसंती मिळत असल्याने घरापासून एक ते दोन तासाच्या अंतरावर असणारी पर्यटनस्थळे पर्यटकांना उपलब्ध करून द्यावीत, या विचारातून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य क्षेत्रात चार नवीन पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळे विकसित करण्याचा विचार वन्यजीव विभागाने सुरू केला आहे. तानसा, क्वारीपाडा, माहुली, सूर्यमाळ भागातील स्थळांचा यात समावेश असणार आहे.

मुंबईपासून जवळ असलेल्या पर्यटन स्थळांना शहरी नागरिक सर्वाधिक पसंती देतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेलपासून तानसा अभयारण्य केवळ १ ते २ तासाच्या अंतरावर आहे. देश, परदेशातील पर्यटक येथे येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने ही स्थळे विकसित केली जाणार आहेत. तानसा अभयारण्यातील पर्यावरणपूरक पर्यटन स्थळे विकसित करण्यामागील मुख्य उद्देश असल्याने निसर्गाबद्दल पर्यटकांनाही ओढ निर्माण होऊन निसर्गाचे जतन करण्याविषयीची जागृती या निमित्ताने होणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणाचे हे लाभक्षेत्रात समावेश असणार आहे.

जंगलातील विविध निर्जीव संपदा आकर्षित पद्धतीने रंगवून त्यावर सुरक्षित सेल्फी पॉइंट तयार करणे, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान विकसित करणे, महत्त्वाची झाडे, फुलपाखरे, प्राण्याची छायाचित्र पर्यटन स्थळी लावली जाणार आहेत. मार्गदर्शन केंद्र पर्यटनकेंद्रात जंगल भ्रमंती, वन्यजीव, वनसंपदा अभ्यासक आणि मार्गदर्शक, पक्षी, प्राणी निरीक्षण मनोरे, जैवविविधता आदींचा समावेश असणार आहे.

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

24 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

36 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

1 hour ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

1 hour ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

2 hours ago