Categories: पालघर

बेपत्ता चिमुकला अखेर आईच्या कुशित विसावला!

Share

विरार (प्रतिनिधी) : नालासोपारा रेल्वे स्थानकातून एका चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे सीसीटीव्हीमुळे समोर आले होते. रेल्वे पोलिसांकडून संशियत अपहरणकर्त्या जोडप्याचा शोध सुरू केला होता. तर दुसऱ्याच दिवशी तुळींज पोलिसांकडून या जोडप्याचा शोध घेऊन मुलाची सुखरूप सुटका केली. या जोडप्याने मुलाचे अपहरण केले नव्हते तर वाट चुकलेल्या मुलाला काळजीपोटी घरी आणले होते, अशी माहिती समोर आली आहे.

भाईंदरच्या उत्तन येथे राहणारी एक कामगार महिला आपल्या दोन लहान मुलासंह गुरूवारी दुपारी वसई येथे कामासाठी आली होती. दुपारी ती कडेवरील मुलाला घेऊन पाणपोईवर पाणी पित असताना, तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा अरूण हा बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या आईने रात्री वसई रेल्वे स्थानकात तक्रार दिली होती.

वसई पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीस सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासत असताना, नालासोपारा येथील फलाटवर एक जोडपे या मुलाला घेऊन जात असताना दिसले. त्याचे अपहरण झाल्याचे समज झाल्याने या अपहणकर्त्या जोडप्यांचा शोध सुरू झाला.

दरम्यान शुक्रवारी तुळींज पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विजय नगर येथून या जोडप्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. त्या जोडप्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

Recent Posts

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

2 minutes ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

5 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

5 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

13 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

24 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

32 minutes ago