नाशिक( प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आरोग्य विभागाला दिले.
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी आढावा घेण्यात आला, त्यावेळी डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील, नाशिक महानगरपालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. त्र्यंबके आदी उपस्थित होते.
गर्भवती मातांना त्यांच्या प्रसूती कालावधीपर्यंत सर्व आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात. तसेच डेंग्यू, चिकनगुन्या या कीटकजन्य आजारांच्या निदानासाठी ग्रामीण भागातील नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या परिसरात सर्व आरोग्य सेवा वेळेत मिळतील, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. सद्यस्थितीत जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील कीटकजन्य आजारी रुग्णांची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियंत्रणात असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी समाधान व्यक्त केले.
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…