महापुरामुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

लाहोर : पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने सरकारने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानात पूरात ९३७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. या पुरामुळे देशातील ३० लाख लोक बेघर झाले आहेत. सिंध प्रांतात सर्वाधिक ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे.


आपत्ती व्यवस्थापन विभाच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात १६६.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा येथील पावसात २४१ टक्के वाढ झाली आहे. सिंध आणि बलुचिस्तानला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वातावरण बदलासंदर्भातील मंत्री शेरी रेहमान यांनी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये वॉर रुम सुरू करण्यात असल्याचे सांगितले आहे.


पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचा युनायटेड किंग्डम दौरा रद्द केला असून ते कतारहून परतल्यानंतर पूर मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करणार आहे, अशी माहिती पाकिस्तान वृत्तवाहिनीने दिली आहे.


रेहमान यांनी मागील आठवड्यात या परिस्थितीची तुलना २०१० मधील पूरपरिस्थितीशी केली होती. मात्र त्यांनी आताची स्थिती २०१० पेक्षाही गंभीर असल्याचे सांगितले. जवळपास ३० लाख लोक बेघर झाले असून हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे अनेक लोकांकडे दोन वेळचं अन्नही जेवायला नाही असे रेहमान यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून

श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; फिट झाल्यानंतर भारतात परतणार

सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

हिंदू पत्नीबद्दलच्या वक्तव्यामुळे व्हान्स यांच्यावर हिंदुफोबिक असल्याची टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सध्या

महापौरपदाचे उमेदवार झोहरान ममदानींनी मोदींवर केले गंभीर आरोप

न्यू यॉर्क : अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील महापौरपदासाठी (मेयर) ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. प्रचारावेळी

ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे 'टॅरिफ युद्ध' थंडावणार?

चीन अमेरिकेचे कृषी, ऊर्जा उत्पादन खरेदी करणार; फेंटॅनाईल संकटावर मदत करण्याचे आश्वासन ग्योंगजू (दक्षिण कोरिया):

पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका, अफगाणिस्तानच्या "या" निर्णयाला भारताचा पाठिंबा

काबुल : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानला धक्का दिला . आता