धोनीसोबत खेळणे माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा क्षण; विराट कोहलीची पोस्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येतोच. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक लढतीआधी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने धोनीवर कौतुकाचा वर्षाव करत त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता, अशी पोस्ट विराटने शेअर केली आहे.


आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान येत्या २८ ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतचा फोटो शेअर करून एक खास पोस्ट केली आहे. "धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता", असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. विराट कोहलीच्या या पोस्टला मोठी पसंती मिळाली आहे. कोहलीच्या या पोस्टला आतापर्यंत १७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कोहलीने २००८मध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अनेक सामने जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीने नंतर कर्णधारपदाची जबाबदारी उपकर्णधार कोहलीवर सोपवली.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत