पाटील क्षयमुक्त झाले

Share

भीमाजी पाटील नावाचे श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते प्रेमळ आणि उदार होते. त्यांच्या घरे येणाऱ्या-जाणाऱ्याचा नेहमी राबता असे. ते सर्वांचे आदरातिथ्य करायचे. १९०९ साली त्यांना क्षयरोग झाला. त्यामुळे ते अंथरुणाला खिळले. वारंवार येणारी खोकल्याची उबळ, सतत येणारा ताप आणि इतर त्रासांमुळे ते खंगून गेले होते. त्यांच्या घरच्या मंडळींनी नामांकित वैद्य, डॉक्टर केले. देवादिकांना नवस केले. पण व्यर्थ! काहीही उपयोग झाला नाही. दुखणे वाढतच गेले. कुटुंबीयांनी त्यांच्या जगण्याची अशाच सोडली होती. पाटीलही आजाराला कंटाळले होते. ते देवाकडे मरण मागत होते. पण तेही येत नव्हते. ते पुरते खचून गेले होते. एके दिवशी त्यांना नानासाहेब चांदोरकरांची आठवण झाली. त्यांनी चांदोरकरांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी आपला दुर्धर व्याधीबद्दल लिहिले आणि त्यांच्या भेटीची इच्छाही व्यक्त केली. पत्र वाचून नानासाहेबांना खूप वाईट वाटले. त्यांनी पाटलांना पत्राचे उत्तर पाठविले. त्यात त्यांनी श्रीसाईबाबांच्या लीला वर्णन करून पाटलांना श्रींच्या दर्शनास शिरडीस जाण्याचा सल्ला दिला.

नानासाहेबांचे पत्र वाचल्यावर पाटलांना थोडा धीर आला. आपल्या आजारावर काहीतरी चांगला उपचार मिळेल, याची त्यांना आशा वाटू लागली. श्रीबाबांच्या लीलांचे वर्णन ऐकून त्यांना कधी एकदा बाबांना भेटतो, असे झाले होते. त्यांनी घरातील मंडळीना शिर्डीला जाण्याची तयारी करण्यास सांगितले. बरोबर विश्वासू मंडळी घेऊन पाटील शिर्डीस आले. त्यांनी गाडी मशिदीच्या चौकाजवळ थांबली. दोघा-चौघांनी त्यांना उचलून बाबांसमोर आणले. त्या वेळी नानासाहेब व माधवराव तेथेच होते. पाटील थोडा वेळ साईच्या संगतीत होते, पण त्या अवधीत श्रींच्या कृपेने त्यांना वारंवार येणाऱ्या रक्ताच्या उलट्या थांबल्या. बाबांच्या सांगण्यावरून ते भीमाबाईंच्या घरी राहिले. काही दिवसांनी पूर्ण बरे होऊन ते जुन्नरला परतले. ते बाबांचे भक्त झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य साईनामातच घालविले.

विलास खानोलकर

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

54 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago