कल्याण परिमंडलात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला गती

  101

कल्याण (वार्ताहर) : महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अखंडित वीज सेवेसाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली आहे.


कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे आणि कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर सातत्याने आढावा घेऊन चालू बिलासह थकबाकी वसुलीबाबत आवश्यक सूचना देत आहेत. त्यानुसार कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर मंडलात क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या कारवाईला गती देत आहेत. वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या ४ लाख ५१ हजार ग्राहकांकडे ७० कोटी ७६ लाख तर तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ७२ हजार ५९५ ग्राहकांकडे २२ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे.


वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहकांना सवलतीची संधी


कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीत सवलत, व्याज व विलंब आकार माफी आणि पुनर्जोडणीची संधी देणाऱ्या ‘विलासराव देशमुख अभय योजनें’चा कालावधी ३१ ऑगस्टला संपणार आहे. कल्याण परिमंडलातील सुमारे ३ लाख २०० लघुदाब व उच्चदाब ग्राहक योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. संबंधित ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन ठाणे  : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात

सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया

बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण

शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती

जिल्हा परिषद कृषी विभागाचा अभिनव उपक्रम ठाणे : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या कामात झाला तर, शेतकऱ्यांना

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल