कल्याण परिमंडलात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला गती

कल्याण (वार्ताहर) : महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अखंडित वीज सेवेसाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली आहे.


कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे आणि कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर सातत्याने आढावा घेऊन चालू बिलासह थकबाकी वसुलीबाबत आवश्यक सूचना देत आहेत. त्यानुसार कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर मंडलात क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या कारवाईला गती देत आहेत. वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या ४ लाख ५१ हजार ग्राहकांकडे ७० कोटी ७६ लाख तर तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ७२ हजार ५९५ ग्राहकांकडे २२ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे.


वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहकांना सवलतीची संधी


कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीत सवलत, व्याज व विलंब आकार माफी आणि पुनर्जोडणीची संधी देणाऱ्या ‘विलासराव देशमुख अभय योजनें’चा कालावधी ३१ ऑगस्टला संपणार आहे. कल्याण परिमंडलातील सुमारे ३ लाख २०० लघुदाब व उच्चदाब ग्राहक योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. संबंधित ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये