उल्हासनगरात शिवसेना-भाजप आमने-सामने

उल्हासनगर : निवडणूकपूर्व युतीचा गाजावाजा, मंचावर दोस्तीचे फोटो आणि भाषणांत एकजुटीचे आश्वासन; मात्र प्रत्यक्ष निवडणूक मैदानात चित्र मात्र पूर्णपणे वेगळे दिसू लागले आहे. 'दोस्ती का गठबंधन' म्हणत जाहीर करण्यात आलेली शिंदेंची शिवसेना, कलानी गट आणि साई पक्षाची युती उल्हासनगरात प्रभाग पातळीवरच कोलमडताना दिसत आहे. दोन प्रभागांत युतीतील पक्षांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने युतीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), कलानी गट आणि साई पक्ष यांनी एकत्र येत 'दोस्ती का गठबंधन' जाहीर केले होते. शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ९ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढणारे कलानी गटाचे उमेदवार आणि दूरदर्शन संच चिन्हावर लढणारे साई पक्षाचे उमेदवार एकाच प्रभागात रिंगणात उतरल्याने 'युती नेमकी आहे तरी कुणाची?' असा प्रश्न मतदार विचारू लागले आहेत.


समन्वयाचा अभाव


यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा आमने-सामने उभे ठाकले असले, तरी यावेळी शिवसेनेला गेल्या निवडणुकीत भाजपसोबत असलेले साई पक्ष आणि कलानी गट यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे लढत वेगळी आणि अधिक रंगतदार ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र युतीतील समन्वयाच्या अभावामुळे ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या