सानिका पाटीलकडे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे नेतृत्व

मुंबई (वार्ताहर) : बिहार येथील पाटलीपुत्र येथे दि.१ ते ४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या "४८व्या कुमारी गट" राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने मंगळवारी आपला १२ जणांचा संघ जाहीर केला. मुंबई उपनगरच्या सानिका परेश पाटील हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची कमान सोपविण्यात आली. सध्या हा संघ अतिग्रे कोल्हापूर येथील संजय घोडावत उद्योग समूह यांच्या संयोजनाखाली संजय घोडावत विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलात सराव करीत आहे. प्रशिक्षिका वर्षा भोसले खेळाडूंकडून डावपेचाचे धडे गिरवून घेत आहेत.


संजय घोडावत उद्योग समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या सराव शिबिराला जातीने भेट देऊन सर्व सुविधांची पाहणी केली आणि संघाला स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी या सराव शिबिरात कोणतीही कसर राहू नये म्हणून लक्ष ठेवून आहेत. घोडावत विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक महेश गावडे यात समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.


निवडण्यात आलेला संघ २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील राज्याच्या कार्यालयात दाखल होऊन, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून सुविधा एक्सप्रेसने स्पर्धेकरिता रवाना होईल. राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी हा संघ जाहीर केला.


महाराष्ट्राचा संघ : १) सानिका परेश पाटील - संघनायिका, २) याशिका पुजारी (दोन्ही मुंबई उपनगर), ३) रेणुका नम, ४) ज्युली मिस्किटा, ५) श्रुती सोमाणे (तिन्ही पालघर), ६) तृप्ती अंधारे, ७) कोमल ससाणे (दोन्ही औरंगाबाद), ८) अनुजा शिंदे, ९) ऋतुजा आंबी (दोन्ही सांगली), १०) मनिषा राठोड (पुणे), ११) सानिका संजय पाटील (नांदेड), १२) प्राची भादवणकर (मुंबई शहर).

संघ प्रशिक्षिका : वर्षा भोसले, संघ व्यवस्थापिका : कोमल चव्हाण.

Comments
Add Comment

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी