सीएनजी वाहनांची विक्री थंडावल्याने ऑटो कंपन्या चिंताग्रस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गॅस कंपन्यांनी सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने आता सीएनजी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. गेल्या एका वर्षात गॅसच्या किमती ५०-६० टक्क्यांनी वाढल्या आहे. त्यामुळे आता कारची विक्री आणि बुकिंग १०-१५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. ही परिस्थिती बघता आता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या प्रकरणी दखल घेण्याची विनंती केली आहे.


इटीआयजीच्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यापासून सीएनजी वाहनांच्या विक्रीमध्ये सतत घट होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याचे मोठे कारण म्हणजे वाढलेले गाड्यांचे दर. पेट्रोल डिझेल वाहनांच्या खरेदीवर सूट मिळाल्याने आणि सीएनजी कार ८० ते ९० हजार रुपयांनी महाग झाल्यामुळे या कारची मागणी कमी झाली आहे.


आकडेवारीनुसार, जुलै २०२२ मध्ये सीएनजी वाहनांच्या विक्रीचा वाटा उद्योगाच्या एकूण वाहन विक्रीपैकी १२% होता. देशात विकल्या जाणा-या सीएनजी प्रवासी वाहनांपैकी सुमारे ८५% वाहने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये विकली जातात. त्यामुळे या भागातील शोरूम्सलाही याचा मोठा फटका बसून त्यांचा उद्योग ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च