सीएनजी वाहनांची विक्री थंडावल्याने ऑटो कंपन्या चिंताग्रस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गॅस कंपन्यांनी सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने आता सीएनजी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. गेल्या एका वर्षात गॅसच्या किमती ५०-६० टक्क्यांनी वाढल्या आहे. त्यामुळे आता कारची विक्री आणि बुकिंग १०-१५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. ही परिस्थिती बघता आता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या प्रकरणी दखल घेण्याची विनंती केली आहे.


इटीआयजीच्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यापासून सीएनजी वाहनांच्या विक्रीमध्ये सतत घट होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याचे मोठे कारण म्हणजे वाढलेले गाड्यांचे दर. पेट्रोल डिझेल वाहनांच्या खरेदीवर सूट मिळाल्याने आणि सीएनजी कार ८० ते ९० हजार रुपयांनी महाग झाल्यामुळे या कारची मागणी कमी झाली आहे.


आकडेवारीनुसार, जुलै २०२२ मध्ये सीएनजी वाहनांच्या विक्रीचा वाटा उद्योगाच्या एकूण वाहन विक्रीपैकी १२% होता. देशात विकल्या जाणा-या सीएनजी प्रवासी वाहनांपैकी सुमारे ८५% वाहने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये विकली जातात. त्यामुळे या भागातील शोरूम्सलाही याचा मोठा फटका बसून त्यांचा उद्योग ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी