अशोक पाटील अखेर शिंदे गटात सामील!

  75

मुंबई (वार्ताहर) : ठाकरे गटातील गळती काही थांबण्याचे नाव नाही. भांडुपचे माजी आमदार अशोक पाटील हे शिंदे गटात सामील झाले. शेकडोहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना घेऊन अशोक पाटील हे शिंदे गटात सामील झाले. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे.


गेल्या काही दिवसांपासून अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडुपमध्ये सुरू होती. भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. 'शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हातपाय तोडू! अशी धमकी जेव्हा दिली जाते, त्यामुळे व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतला आहे. "जर कुणी आमचे हात पाय तोडणार असतील "तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी," असा आव्हानात्मक निर्वाणीचा इशारा अशोक पाटील यांनी दिला.


यावेळी, ईशान्य मुंबई विभाग संघटिका संध्या वढावकर, माजी नगरसेविका मीनाक्षी अशोक पाटील, महिला उपविभाग संघटिका राजश्री राजन मांदविलकर, महिला शाखा संघटक सुरेखा पांचाळ, माजी शाखाप्रमुख कृष्णा शेलार, माजी शाखाप्रमुख विजय परब, उपशाखाप्रमुख संजय दुडे, अनंत जाधव, अविनाश बागुल, नितीन शिंदे, अंकुश करांडे, जगदीश शेट्टी, उदय महाडिक, संजय शिंदे, रमेश टक्के, अलका सावंत, सोनल गिरी, आशा साळवी, शितल बडदे, माधुरी वाघेला, नंदा वाघेला या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी अशोक पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री