Categories: कोलाज

काय भुललासी…?

Share

ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा…

प्रियानी पाटील

संत चोखामेळा यांच्या या अभंगातून वरवरचं रूपडं आणि अंतरंग यांचा परस्पर काही संबंध नसतो या अर्थानेच माणसाचं वरवरच दिसणं आणि त्याचा स्वभाव यात कधी कधी जमीन अस्मानाचा फरक असू शकतो हे देखील तितकेच खरे आहे.

मग ती स्त्री असो अथवा पुरुष.

एक अंकल आपल्या जीवनातील किस्सा सांगताना आपल्या पत्नीची ओळख देताना म्हणाले, ही एकदम मनाने चांगली आहे. आहे गव्हाळ रंगाची पण तितकीच ती अंतरंगाने सोन्यासारखीच आहे. आपल्या पत्नीची ओळख देताना त्यांनी आपल्या चष्म्याची काच दोनदा पुसली. म्हणाले, लग्नात मुलगी पाहताना माझी दुसऱ्यांदा फसगत होऊ नये म्हणून मी हा नवा चष्मासुद्धा घेतला. त्यांच्या बोलण्यातून फसगत हा शब्द आला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तसे ते म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा मी मुलगी पाहण्यास गेलो होतो, तेव्हा मुलीला एका क्षणात पसंत केली होती. काय तो चेहरा, काय ते सौंदर्य वर्णन करताना तिच्या गोऱ्या म्हणण्यापेक्षा पांढऱ्या रंगाचं कौतुक करायला ते अजिबात विसरले नाहीत. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा न राहावल्यामुळे हे महाशय त्या मुलीला आठ दिवसांतच कुणालाही न कळवता तिच्या घरी भेटायला गेले. तेव्हा मुलगी दाखवायच्या कार्यक्रमात उपस्थित नसलेली एक व्यक्ती त्यांच्या नजरेस पडली. त्यांना वाटले

मुलीची मावशी किंवा आत्या असावी. त्यांनी तिला आपली ओळख देत म्हटले, मावशी… मावशी मी आलोय म्हणून सांगा मुलीला किंवा तिच्या वडिलांना किंवा आईला.

या मावशीला असं सांगताच ती हातातलं काम टाकून लाजली आणि आत पळणार इतक्यात मुलीची आई बाहेर आली. या महाशयांनी पुन्हा तोंड उघडले, म्हणाले, मावशी कुठे असतात, म्हणजे कार्यक्रमात नव्हत्या ना म्हणून म्हटले.

तशी मुलीची आई वरमली. म्हणाले, तुम्ही काय बोलताय. मुलीची ओळख आठ दिवसांतच विसरलात, तर जन्मभर काय सांभाळणार तुम्ही हिला? त्यांच्या लक्षात काही येईना. ते भांबावले. ते या मावशीकडे पाहतच राहिले. तशी ती आणखी लाजली.

तशी आई म्हणाली, ही काही कुणी मावशी नाही, माझी मुलगीच आहे आणि तुमची होणारी पत्नी. जा गं आत जा आणि चांगला परवासारखा मेकअप करून ये. तुझा होणारा नवरा तुझी ओळखच विसरून गेलाय. कसं व्हायचं पुढे तुमचं म्हणून ती हसायला लागली. भावी सासुबाईंचे हे बोलणे ऐकून हे अंकल एवढे धास्तावले की घामाने भिजले.

अरे हा काय प्रकार आहे? मुलीचा कार्यक्रमावेळचा पांढरा रंग आणि आताचा रंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. केवढी फसवणूक आहे, म्हणून अंकल काय समजायचे ते समजले आणि त्यांनी तिथून तत्काळ काढता पाय घेतला. आणि स्पष्ट नकार कळवला.

अंकलनी हा किस्सा सांगताना असंही म्हटलं शेवटी… मी त्या कार्यक्रमात मुलगी पाहायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मुलीला बिना मेकअप समोर आणली असती तरी मी एकवेळ पसंत केली असती, पण मेकअपच्या आतील चेहरा एक, वरवरचा रंग एक अशा प्रकारे केलेली ही फसवणूक माझीही होती आणि माझ्या घरातील माणसांचीही होती. जे आहे ते लपवायचं कशाला? मला फसवणूक बिलकूल मान्य नाही म्हणून मी ते लग्न मोडलं, असे अंकल स्पष्टच बोलले आणि त्यांनी एक सत्यता स्पष्ट केली.

सत्य आणि असत्याची बाजू मांडतानाही आपण सत्याच्या मार्गाने चालण्याचे धाडस दाखवले पाहिजे. नाही तर एक खोटं बोलता बोलता माणूस हजारदा खोटं बोलून ते पचनी पाडतो.

अलीकडे फोटो एडिटिंग करूनही असणं एक आणि दिसणं एक असं समीकरण बनू लागलं आहे. यामुळेही अनेकदा फसगत होऊ शकते. खरं तर रंग कोणताही असो, काळा किंवा गोरा यात भेद न मानता मनाच्या खऱ्या रंगाची ओळख पटवून घेतली पाहिजे. अंकलनी त्या मुलीला नकार देण्याचं कारण हे त्या मुलीचा रंग नव्हताच मुळी, तर त्यांच्याकडून झालेली फसगत हे होतं. हे कुणालाही सहज कळण्यासारखं होतं.

आपला रंग काळा असो अथवा गोरा आपल्या मनात असं न्युनगंड निर्माण जेव्हा होतं, तेव्हा इतरांपेक्षा आपण सरस दिसण्यासाठी असे नवनवीन रंग चेहऱ्यापासून मनापर्यंत तयार झालेले असतात. जे दुसऱ्यांना कमी लेखण्यापर्यंतही कधी कधी उमटतात.

रंगांच्या दुनियेत प्रत्येक रंग हा आपली ओळख घडवितो. माणसाच्या बाह्य रंगापेक्षा अंतरंग किती चांगले आहे हे जाणणे गरजेचे आहे. सफेद केसांना काळा रंग तारुण्य जपताना दिसतो. तारुण्याचा खरा रंग असतो तो मनाचा सच्चेपणा. जेवढं सच्चेपणानं वागलं जाईल तितकं समाधान मनाला लाभेल.

कधी कधी खोटं बोलणंही माणसाचा खरा रंग दाखवून जातो. उगाचच खोटं बोलण्याच्या सवयीमुळे माणूस समोरच्या माणसाचा विश्वास गमावून बसतो. खोटं बोलण्याची सवय लागू नये म्हणून घरातून लहानपणापासून चांगले संस्कार आवश्यक असतात. लहान मुलांना खोटं बोलू नये अशी शिकवण देऊन ती अंगीकारण्याची त्यांना सवय लावणंही तितकंच गरजेचे आहे.

रंग असो, स्वभाव असो तो पारदर्शक असणं आवश्यक असतो. खरं ते खरं, खोटं ते खोटं ठरवतानाही पारदर्शकता महत्त्वाची ठरते. आपणाला केव्हा पण चांगल्या गोष्टीच हव्या असतात. पण कधी कधी वाईट गोष्टी पदरी पडतात, तेव्हा त्या स्वीकारताना मन खट्टू होऊन जातं, पण जेव्हा त्याची खरी ओळख पटते तेव्हा आपण किती चुकीचा विचार करत होतो, हे लक्षात येते. बाह्यरंगापेक्षा अंतरंग सरस ठरते. दिखावा, फसवणूक, वरवरचे रंग यामध्ये अंतरंग कसे हे पाहणे जरुरी ठरते. आयुष्यात आपण वरवरच्या गोष्टींवर भुलण्यापेक्षा सच्चेपणाचे अंतरंग पारखणे गरजेचे आहे.

Recent Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आदेश! सर्व राज्यांतल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा

अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

16 minutes ago

Eknath Shinde: पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार

मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…

18 minutes ago

Mumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…

45 minutes ago

मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…

47 minutes ago

Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत!

मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…

1 hour ago

AC Compressor: उन्हाळयात ​AC कम्प्रेसर फुटून आग लागण्याचा धोका सर्वाधिक! ही घ्या काळजी

AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…

1 hour ago