मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या तलावांत १३ लाख ८१ हजार ५० दशलक्ष लिटर (९५.४२ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला जवळजवळ ३५८ दिवस म्हणजेच पुढील ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली आणि तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणारे सगळेच सात तलाव भरले असून काही तलाव ओव्हर फ्लो देखील झाले आहेत.
सध्या सर्व सात तलावांत मिळून एकूण १३ लाख ८१ हजार ५० दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील ११ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधीसाठी पुरेल इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्याशिवाय यंदा पावसाचा आणखी दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात आणखी चांगला पाऊस पडून काही दिवसांतच सर्वच तलाव भरून वाहू लागतील. परिणामी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली आहे.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…