शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, चाकू हल्ला प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आज (मंगळवार) चार जणांना अटक केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुलतान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाला होता. यावेळी गांधीनगर भागात एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रेमसिंह असे असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील तणावपूर्व स्थिती पाहता प्रशासनाने तीन दिवसांसाठी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत पोलिसांनी नदीम (२५), अब्दुल रहमान (२५) आणि जबीउल्लाह या चारपैकी तीन जणांची ओळख उघड केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी नदीमचा २०१६ मध्ये शिवमोगा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या जातीय संघर्षात सहभाग होता, असे सांगितले.
कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी जखमी युवकाची भेट घेतली आहे. आरोपींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे. शिवमोगातील हल्ला हा सावरकर फलकाच्या वादाशी संबधित असावा असे दिसते आहे. पण, अद्याप पूर्ण माहिती हाती आलेली नाही, अशी प्रतिक्रिया ज्ञानेंद्र यांनी दिली.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…