दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी फडकावला तिरंगा

श्रीनगर : दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला आहे. शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहतात. त्याच्या या कृतीने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शाहनवाजच्या वडिलांनी त्याला एक संदेशही दिला आहे. मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी शाहनवाजच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. आमचे सगळे हिंदुस्तानात आहे. पाकिस्तानशी आमचा कोणाताही संबंध नाही, असेही ते यावेळी म्हणाले.


शाहनवाज कंठचे २२ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते. आपला मुलगा पुन्हा भारतात परतावा व त्याने दहशतवादाच्या दलदलीतून बाहेर पडावे, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आजच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने त्यांनी शाहनवाजला पुन्हा परतण्याचे आवाहन केले आहे.


किश्तवाडयेथील हुलर गावात राहणारे अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा नवाज कंठ यांनी रविवारी नगर परिषदचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करुन तिरंगा देण्यास सांगितले. नगर परिषद अध्यक्ष सज्जाद यांनी तिरंगा दिल्यानंतर कुटुंबीयांसोबत घरावर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण केले.


२००० मध्ये दहशतवादी शाहनवाजला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. २०१५ पर्यंत कधीतरी त्यांच्याशी संपर्क होत होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासोबत काहीच संपर्क झालेला नाही. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या मुलाला परत येण्याचे आवाहन करत आहोत, असे शाहनवाजचे वडील अब्दुल रशीद कंठ यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत