पंकजा मुंडेंकडून चूक महाग पडल्याची जाहीर कबुली

Share

परळी : माझी चूक झाली असेल, विकास करण्यात, देण्या-घेण्यात चूक झाली असेल, मला वेळ मिळाला नसेल, पण आता मला वेळच वेळ आहे. लोकशाहीत प्रत्येकाला चुकीची किंमत चुकवावी लागते. जिथे मी तेथे तुमची साथ आहे. घुमून-फिरुन मला सांगितले जाते की परळीला सांभाळा. आता काय करता, परळीची एक चूक किती महागात पडली हे माहिती आहे ना. मी थांबणार नाही, झुकणार नाही. मी पातळी सोडून कधीही शत्रूवर टीका केली नाही. माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. संघर्षाला मी घाबरत नाही. मंत्रिपद मिळाल्यास विकास करेन, असे म्हणत पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी येथे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कधीही सूडबुद्धीने, पातळी सोडून वागले नाही. हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. मी सेवा करताना मागे राहिले असेल. एखाद्या माणसाचा नमस्कार मला दिसला नसेल. मात्र, या गर्दीत न दुखावता कुणी राहू शकत नाही. गोपीनाथ मुंडेंचा पराभव झाला, तेव्हा भारतात सर्वच नेते पडले होते. त्यानंतर उत्तमराव पाटील यांनी मुंडेंना प्रदेशाध्यक्ष केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

पंकजा म्हणाल्या, आज गौरवाचा दिवस आहे. शत्रुत्वाचा नाही. गोपीनाथ मुंडे यांचा पराभव झाला होता. माझाही पराभव झाला. या पराभवाची चर्चा जास्त झाली, पण मी हृदयातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही.

पंकजा म्हणाल्या, मला ९२ हजार लोकांनी मतदान केले. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आजचा क्षण आपला आहे. मी सांगते विकासाच्या धामधूमीने एखादा विषय राहिला असेल, पण आज गौरव आणि स्वातंत्र्य दिन आहे. तुमच्या डोळ्यात समाधान आहे तोपर्यंत माझे राजकीय जीवन आहे. तुमच्या चरणी माझे राजकीय जीवन आहे. मला वाटतं की, घरी बसावे, पण तुमचे चेहरे डोळ्यासमोर येतात. नेत्यांचे काम आणि आत्मसन्मान देणे आहे. मात्र, हे काम जेव्हा बंद होईल तेव्हा माझ्या राजकारणात अर्थ राहणार नाही. आपल्या तोंडचा घास कुणीही हिरावून घेणार नाही याची काळजी करू. आपल्याला आता भक्कम उभे राहायचे आहे. लोकांनी रांगा लावण्यापेक्षा लोकांकडे जाणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण परत आणावे लागेल. सरकार कोणतेही असो, मला दौरा करायचा होता, पण पक्षाने इतर नेत्यांचा दौरा लावला. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप केला नाही. नाशिक, पिंपरी-चिंचवडला गेले. ओबीसी आरक्षणावर आवाज उठवला. मराठा आरक्षणासाठीही मागणी करणार. त्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण करणारे सरकार आपल्याला हवे. हे सरकार आता तुमचे आहे. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

1 hour ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

2 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

3 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

4 hours ago