मुंबई (वार्ताहर) : बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २२ सुवर्णांसह ६१ पदकांची कमाई करताना चौथे स्थान मिळवले आहे. पदक विजेत्यांमध्ये मुंबईचे अवघे तीन खेळाडू आहेत. त्यात बॅडमिंटन दुहेरीत सुवर्ण कामगिरी केलेला चिराग शेट्टी आणि टेबल टेनिस विजेत्या पुरुष संघातील सनिल शेट्टी यांचा समावेश आहे.
मुंबईच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण तितक्याच रौप्यपदकांमध्ये सहभाग दर्शवला आहे. मात्र, ही चारही पदके सांघिक खेळातील आहेत. मुंबईचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याने पुरुष दुहेरीत सत्विकराज रनकीरेड्डीसह बाजी मारली. बॅडमिंटन मिश्र संघाच्या रौप्य पदकामध्येही त्याचा समावेश आहे.
सनिल शेट्टी याचा सहभाग असलेल्या टेबल टेनिस पुरुष संघाने बाजी मारली. महिला क्रिकेट संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या संघात महाराष्ट्राच्या स्मृती मन्धाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा समावेश होता.
राज्यातील क्रीडापटूंच्या कामगिरीचा विचार करता मांडवा, बीडचा धावपटू अविनाश साबळे याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक मिळवले. २१ वर्षीय सांगलीचा वेटलिफ्टर संकेत सरगर याचे पुरुषांच्या ५५ किलो गटातील सुवर्णपदक थोडक्यात हुकले.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…