विराटचा विक्रम मोडण्याची रोहितला संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनिमित्त भारताचा कर्णधार रोहित शर्माला माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आपल्या नेतृत्वाखाली टी-२० सामने जिंकण्याच्या विक्रमामध्ये विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी रोहितकडे आहे.


आशिया चषक स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. आशियातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणाही केली आहे. या स्पर्धेकरिता रोहित शर्माकडेच नेतृत्वाची कमान सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोहितला माजी कर्णधार विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे.


भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकले आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ३० सामने जिंकले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितने आतापर्यंत २९ सामने जिंकले आहेत. यामुळे आशिया चषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत