Categories: पालघर

मासेमारीसाठी गेलेल्या पालघरमधील दोन हजार बोटींबाबत चिंता

Share

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यातच सुमद्रात वादळी हवामान असल्याने मासेमारीसाठी किमान दोन हजार बोटी गेल्याने चिंतेचे वातावरण आहे. तर या बोटी वादळामध्ये तटस्थ उभ्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मासेमारीसाठी लागणारा खर्च वाढल्याने रिकामे परत येणे, शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात ७ ते ११ ऑगस्टदरम्यान ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला होता. त्यानुसार, किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वारे असे वातावरण सलग काही दिवस कायम आहे. समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याने मच्छिमार संस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली. मात्र या इशाऱ्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन हजार बोटी आजही समुद्रात असल्याची माहिती समोर आली आहे. पालघर, वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांमधील बोटींचा यात समावेश आहे.

किनारपट्टीवरून मासेमारीसाठी समुद्रात सुमारे आठ ते दहा तास लांब अंतरावर जाऊन मासेमारी न करताच किनाऱ्यावर परतणे डिझेलच्या चढ्या दरांमुळे आणि कामगारांच्या पगारामुळे परवडत नसल्याने या धोकादायक परिस्थितीतही या बोटी समुद्रात ठाण मांडून उभ्या असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले. मोसमातील पहिल्याच फेरीसाठी कर्ज काढून मासेमारीला गेलेल्या बोटीला मासेच मिळाले नाहीत, तर मग पुढच्या फेरीसाठी डिझेल, बर्फ, कामगारांच्या पगारासाठी पैसे कुठून आणायचे, अशी चिंता मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

20 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

22 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

59 minutes ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

2 hours ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

2 hours ago