मुंबई (वार्ताहर) : मुंबई पालिकेने पाली हिल रोडवरील १०० हून अधिक दुकानांना नोटीसा बजावल्या आहेत. फेरीवाल्यांना त्यांच्या दुकानातून व्यवसाय करण्यास किंवा त्यांचे सामान लपविण्यास मदत केल्यास परवाना रद्द करण्यासह कडक कारवाईचा इशारा या दुकानांना दिला आहे.
“पालिकेचे वाहन पाहून काही बेकायदेशीर फेरीवाले हिल रोडच्या फूटपाथला लागून असलेल्या दुकानांमध्ये आपला माल लपवतात आणि घटनास्थळावरून पळून जातात. हिल रोडलगत असलेले दुकानदार आणि सोसायटी अशा बेकायदेशीर फेरीवाल्यांना त्यांचा माल त्यांच्या दुकानात लपवू देतात आणि त्यामुळे अशा अवैध फेरीवाल्यांना पालिकेची कारवाई टाळण्यास मदत होते.
त्यामुळे बेकायदा फेरीवाले माघारी फिरतात आणि जनतेला अडथळा व त्रास होतो, असे पालिकेतर्फे बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे. पालिकेने नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की अशा कृतींमुळे जप्ती कारवाईची कार्यक्षमता कमी होते आणि नागरी अधिकाराच्या मार्गात अडथळे निर्माण होतात, असे पालिकेचे म्हणणे आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…