आरबीआयची तीन बँकांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील एकूण ८ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. सर्व बँकांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ३ सहकारी बँकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, द यवतमाळ को ऑपरेटिव्ह बँक ली., वरुड को-ऑपरेटिव्ह बँक लि. या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


आरबीआयने सहकारी बँकांसाठी घालून दिलेले नियमांचे पालन न केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ लाख रुपयांचा दंड केला आहे. केवायसी संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ३.५० लाखांचा तर वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाख रुपयांचा दंड केला आहे.


महाराष्ट्रातील या तीन बँकांसोबतच गुजरातमधील मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ४० लाख रुपये, मध्य प्रदेशमधील जिल्हा सहकारी बँक, छत्तीसगडमधील राज्य सहकारी बँक, गुना येथील एका सहकारी तर पणजी येथील गोवा राज्या सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी जुलै महिन्यात द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेवर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली होती.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास