राज्यात अनेक भागात अतिमुसळधार

मुंबई : मागील २४ तासात महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. तसेच पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ११ ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्यातच मागील २४ तासात महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक ३३० मिमी पावसाची नोंद रत्नागिरीतील लांजा तालुक्यात झाली.


पालघर, रत्नागिरी, पुणे आणि रायगडातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट कायम आहे, मात्र तो फक्त घाट परिसरासाठीच असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. तसेच पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट


मुंबईसह परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुंबईत रात्री अडीच ते सकाळी साडेआठ पर्यंत १०० मिमीहून अधिक पाऊस झाला. सांताक्रूज वेधशाळेत १२४ मिमी तर अंधेरीत १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र पावसाचा जोर कमी होणार असून १०० मिमीपर्यंतच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टी


मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीत २०० मिमी, साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये १९० मिमी पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत १५० मिमी तर लोणावळ्यात १४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


मराठवाड्यातही पावसाची हजेरी


तिकडे मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वैजापूर, कन्नड, लोहारा, भोकरदनमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली.


विदर्भात अतिवृष्टीची शक्यता


विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला - उपमुख्यमंत्री अजित