राज्यात अनेक भागात अतिमुसळधार

मुंबई : मागील २४ तासात महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. तसेच पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ११ ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्यातच मागील २४ तासात महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक ३३० मिमी पावसाची नोंद रत्नागिरीतील लांजा तालुक्यात झाली.


पालघर, रत्नागिरी, पुणे आणि रायगडातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट कायम आहे, मात्र तो फक्त घाट परिसरासाठीच असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. तसेच पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट


मुंबईसह परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुंबईत रात्री अडीच ते सकाळी साडेआठ पर्यंत १०० मिमीहून अधिक पाऊस झाला. सांताक्रूज वेधशाळेत १२४ मिमी तर अंधेरीत १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र पावसाचा जोर कमी होणार असून १०० मिमीपर्यंतच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टी


मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीत २०० मिमी, साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये १९० मिमी पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत १५० मिमी तर लोणावळ्यात १४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


मराठवाड्यातही पावसाची हजेरी


तिकडे मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वैजापूर, कन्नड, लोहारा, भोकरदनमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली.


विदर्भात अतिवृष्टीची शक्यता


विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात