नितेश राणेंकडून गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस'ची घोषणा

  91

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. यामुळेच एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होऊन जाते. एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. दरम्यान, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस धावणार आहे.


भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. दादर ते कणकवली दरम्यान 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण व त्यासोबत आरतीचे पुस्तक ही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी ही 'मोदी एक्सप्रेस' कोकणात जाणार आहे.


यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, काय मग गाववाल्यांनो गणपतीत गावाक जायचे की नाही? मग चला तयारीला लागा. चला मग भेटू २९ तारखेला. गणपती बाप्पा मोरया! नितेश राणे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे.


२९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे’. ‘ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचे जेवण दिले जाणार आहे. आरतीचे पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
तिकीटासाठी भाजपाच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे, असे नितेश राणेंनी सांगितले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.


यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. कोकण वासियांसाठी गणपती हा खूप मोठा सण आहे. चाकरमानी कितीही व्यस्त असला तरी सर्व बाजूला सारून तो गणपतीत आपल्या गावाकडे जातो. परंतु, या दिवसांत बस असेल ट्रेन असेल यांचे बुकिंग भेटणे फार कठीण असते. त्याचबरोबर याचे दर सुद्धा अव्वाच्या सव्वा असतात. म्हणूनच ‘मोदी एक्सप्रेस' चा फायदा हा मागच्या वर्षीपासून मुंबईतील बरेच चाकरमानी घेत आले आहेत. यंदाही त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री