उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची हॉटेलात बिर्याणी पार्टी

  109

अमरावती : नुपूर शर्मांना समर्थन केल्याप्रकरणी उदयपूर येथे एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रातील अमरावती येथेही उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत असून आरोपींनी कोल्हेंची हत्या केल्यानंतर हॉटेलात जाऊन बिर्याणी पार्टी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.


नव्याने अटक केलेल्या मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज यांना विशेष न्यायलयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर बिर्याणी पार्टी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर एनआयएने आपला तपासाचा वेग वाढवला असून त्यामध्ये आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर शाहरूख पठान (२५), शेख इरफान, मुदस्सिर अहमद (२२), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) व यूसुफ खान बहादूर खान (४४) या ६ आरोपींना एनआयएने अटक केली होती. त्यानंतर मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना एनआयएने अटक केली होती. या हल्ल्यातील मास्टरमाइंड असलेल्या इरफान शेख याला लपवण्यास आणि पळवून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून विशेष न्यायालयात त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.


दरम्यान, ५४ वर्षीय उमेश कोल्हे यांच्यावर २१ जून रोजी रात्री १०-१०.३०च्या सुमारास अमरावती येथे तीन हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला होता. गंभीर अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याप्रकरणी त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक