स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जैशकडून दहशतवादी हल्ल्याची भीती

नवी दिल्ली : भारत ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांना धोक्याचा इशारा दिला असून सतर्क राहण्यास सांगितले आहे. इंटेलिजन्स ब्युरोने १० पानांचा अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा ते उदयपूर आणि अमरावती या दहशतवादी संघटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनासंदर्भात दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.


आयबीने आपल्या अहवालात कट्टरपंथी गटांच्या धोक्याबद्दल बोलले आहे. तसेच, १५ ऑगस्टसाठी दिल्ली पोलिसांना लाल किल्ल्यावर प्रवेशासाठी कठोर नियम लागू करण्यास सांगितले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचाही समावेश आयबीने अहवालात केला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीबाबत सूचनाही जारी केली होती.


उदयपूर आणि अमरावतीमधील घटना पाहता, एजन्सींनी पोलिसांना कट्टरपंथी गट आणि गर्दीच्या भागात त्यांच्या कारवायांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानची आयएसआय जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांना मदत करून दहशतवादी घटनांना भडकावत आहे. दहशतवाद्यांना बडे नेते आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे