स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जैशकडून दहशतवादी हल्ल्याची भीती

नवी दिल्ली : भारत ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांना धोक्याचा इशारा दिला असून सतर्क राहण्यास सांगितले आहे. इंटेलिजन्स ब्युरोने १० पानांचा अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा ते उदयपूर आणि अमरावती या दहशतवादी संघटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनासंदर्भात दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.


आयबीने आपल्या अहवालात कट्टरपंथी गटांच्या धोक्याबद्दल बोलले आहे. तसेच, १५ ऑगस्टसाठी दिल्ली पोलिसांना लाल किल्ल्यावर प्रवेशासाठी कठोर नियम लागू करण्यास सांगितले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचाही समावेश आयबीने अहवालात केला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीबाबत सूचनाही जारी केली होती.


उदयपूर आणि अमरावतीमधील घटना पाहता, एजन्सींनी पोलिसांना कट्टरपंथी गट आणि गर्दीच्या भागात त्यांच्या कारवायांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानची आयएसआय जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांना मदत करून दहशतवादी घटनांना भडकावत आहे. दहशतवाद्यांना बडे नेते आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान