स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जैशकडून दहशतवादी हल्ल्याची भीती

  58

नवी दिल्ली : भारत ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांना धोक्याचा इशारा दिला असून सतर्क राहण्यास सांगितले आहे. इंटेलिजन्स ब्युरोने १० पानांचा अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा ते उदयपूर आणि अमरावती या दहशतवादी संघटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनासंदर्भात दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.


आयबीने आपल्या अहवालात कट्टरपंथी गटांच्या धोक्याबद्दल बोलले आहे. तसेच, १५ ऑगस्टसाठी दिल्ली पोलिसांना लाल किल्ल्यावर प्रवेशासाठी कठोर नियम लागू करण्यास सांगितले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचाही समावेश आयबीने अहवालात केला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीबाबत सूचनाही जारी केली होती.


उदयपूर आणि अमरावतीमधील घटना पाहता, एजन्सींनी पोलिसांना कट्टरपंथी गट आणि गर्दीच्या भागात त्यांच्या कारवायांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानची आयएसआय जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांना मदत करून दहशतवादी घटनांना भडकावत आहे. दहशतवाद्यांना बडे नेते आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या