जलतरणपटू प्रभात कोळीची विक्रमी कामगिरी

मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने नुकतेच अमेरिकेतील लेक टाहो (३५ किमी) अंतर १२ तास ३७ मिनिटांत पार करत अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान मिळविला. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्वीमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहीला जलतरणपटू ठरला.


कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन या वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या नामांकनामध्ये अमेरिकेतील कॅटलिना चॅनेल (३४ किमी) सान्ताबार्बारा चॅनेल (२० किमी) तसेच लेक टाहो लेंगथ स्विम (३५ किमी) या अतिशय खडतर जलतरण मोहिमांचा समावेश आहे. प्रभात कोळीने तिन्ही आव्हाने यशस्वीरित्या पार करत आशिया खंडातील प्रथम जलतरणपटूचा मान मिळविला.


प्रभातने कॅटलिना चॅनेल २०१६ मध्ये सांताबार्बरा येथील चॅनेल २०१९ मध्ये व लेक टाहो लेंग्थ स्विम हे आव्हान नुकतेच पार केले. समुद्र सपाटीपासून १८०० मीटर उंचीवर स्थित लेक टाहो लेंग्थ (३५ किमी) पोहणे हे अतिशय खडतर आव्हान आहे. समुद्र सपाटीपासून उंचीवर असल्यामुळे विरळ ऑक्सिजन त्याचप्रमाणे लेकचे पाणी ९९ टक्के शुद्ध असल्यामुळे पाण्याची घनता कमी असल्याने पोहण्यास अतिशय कठीण शिवाय जलतरणाची वेळ रात्रीची, या सर्व आव्हानांवर मात करत प्रभातने ही मोहीम फत्ते केली.

Comments
Add Comment

‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर

दिवाळी रॉकेटमुळे बोरिवलीत मोठी आग; दुकाने जळून लाखोंचे नुकसान

मुंबई: कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे सोमवारी पहाटे एका चाळीमध्ये लागलेल्या आगीत १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या