रत्नागिरीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे ‘पोषण’ की ‘शोषण’

Share

रत्नागिरी (वार्ताहर) : विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना त्याची प्रथम मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन कमिटीने पाहणी करणे व चव घेणे गरजेचे आहे. संपूर्ण आहार शिजवून झाल्यानंतर, त्याची पूर्णपणे टेस्ट घेतल्यानंतर काही वेळानंतरच तो विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे. मात्र शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे रत्नागिरी शहरातील एका शाळेत विद्यार्थ्यांना कच्चा भात देण्यात आला. तो विद्यार्थ्यांनी चांगला नसल्याने फेकून दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरी प्रभारी शिक्षणाधिकारी स्नेहल पेडणेकर यांनी शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून दिला जातो. मात्र पोषण आहार देण्या अगोदर पाहणी करणे, त्याची टेस्ट घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अनेक शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन कमिटीही मोबइलमध्ये गुंग असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक शाळांमधून शिक्षक व्यवस्थित काम करतात. त्यांच्या कोणत्याही तक्रारी येत नाहीत. मात्र काही शाळा त्याला अपवाद आहेत. भरमसाट पटसंख्या, विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचा भाव यामुळे पोषण आहार करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. रत्नागिरी शहरासह अनेक ठिकाणी पोषण आहाराची वरिष्ठ पातळीवर अधिकारी तपासणीच करीत नाहीत. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यांना घरुन पाणी आणायला सांगितले जाते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचीही चांगली व्यवस्था नसल्याने अनेक मुले हिरमुसली होतात. तसेच शाळेमधील वातावरणही आनंदी असणे गरजेचे आहे.

भरमसाट विद्यार्थी घेऊन आपण मोठे महान कार्य करतोय अशा अाविर्भावात अनेकजण असतात. परंतु या विद्यार्थ्यांकडे पुरेशा प्रमाणात लक्षच दिले जात नाही. विद्यार्थ्यांना कच्चा भात देणाऱ्यांवर आणि त्याची तपासणी करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? याची चर्चा शहरासह जिल्ह्यात सुरु झाली आहे. अनेक वेळा या शाळांना मंत्री, जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी भेटी देतात. परंतु केव्हाही स्वयंपाक घरात जाऊन तेथील अन्नाची तेथील पोषण आहाराची पाहणी केली जात नाही. रत्नागिरी प्रभारी शिक्षणाधिकारी स्नेहल पेडणेकर यांनी शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट केल्याने पोषण आहारासारख्या गंभीर बाबीकडे जिल्हाभरातील सर्वच शाळा आता दक्ष राहून लक्ष देतील, अशा आशा निर्माण झाल्या आहेत.

शिक्षकांची चौकशी करून उचित कारवाई करणार – प्रभारी शिक्षणाधिकारी स्नेहल पेडणेकर

Recent Posts

Jammu Kashmir Trekking : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती!

पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…

6 minutes ago

Food Poisoning : लग्न समारंभाला जाताय सावधान! जेवणातून ६०० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…

38 minutes ago

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांना केले रोममधील चर्चमध्ये दफन

अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…

50 minutes ago

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या ‘ऑपेरेशन ऑल आऊट’ला सुरुवात, १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली

जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…

1 hour ago

Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे

मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…

1 hour ago

लवकरच येत आहे प्लानेट स्त्री, महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी

मुंबई : 'प्लानेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी 'प्लानेट स्त्री'…

2 hours ago