या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम


रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातील आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी बाजारात येते. मात्र यावर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागेल, असे आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. या वर्षीही आंबा पिकावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असून आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर्षी खवय्यांना हापूस आंब्याची चव उशिराच चाखायला मिळणार आहे.


आंबा हे कोकणातील प्रमुख पारंपरिक बागायती पीक आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. आंबा उत्पादनात हापूस आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा पिकाची हेक्टरी उत्पादकता २.५० मेट्रिक टन आहे. कोकणातील खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे.


सुमारे २५ हजार मेट्रिक टन हापूस निर्यात होतो. दरवर्षी युरोपियन देशांसह दुबई, सिंगापूर आणि मध्य आशियातील इतर देशांमध्येही हापूस आंब्याची निर्यात होते. पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होतो. कोकणातील आंबा उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षात महत्त्व वाढले आहे. मात्र हाच हापूस आंबा सातत्याने हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे.


त्यामुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. हवामानातील बदलांचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवरही होत आहे. आंब्याला फुले, फळे येण्यासाठी आणि निरोगी फळांमध्ये परिपक्वता येण्यासाठी विशिष्ट हवामान परिस्थितीची आवश्यकता असते. मात्र सातत्याने हवामान बदलामुळे यंदा हापूसचे पीक धोक्यात आले आहे.

Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण