महाराष्ट्राने वीज कंपन्यांचे सर्वाधिक २१,५०० कोटी थकवले!

मुंबई : ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्राची वीज कंपन्यांकडे सर्वाधिक २१,५०० कोटी देणे थकबाकी असल्याचे आढळून येत आहे. मात्र ‘लेखा प्रक्रियेत काही विसंगती होती. गणनेनुसार थकबाकी १३,५०० कोटींपेक्षा जास्त नाही’, असे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आहे. आता याबाबत सुधारणा करण्यासाठी आणि केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला कळवण्यासाठी बैठक होणार आहे, असे विजय सिंघल म्हणाले.


आम्ही आमच्या खाती आणि गणनेचे तपशील देऊ. जे दर्शविते की जेनकोसवरील आमची थकबाकी १३,५०० कोटींपेक्षा जास्त नाही, असेही विजय सिंघल म्हणाले. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रानंतर तामिळनाडूवर २०,९९० कोटींची थकबाकी आहे. तर जेनकोसची थकबाकी वाढत आहे.


२.८ कोटींहून अधिक ग्राहकांसाठी राज्य पॉवर डिस्कॉम असलेल्या महावितरणलाही वीज बिलांद्वारे पैसे वसूल करण्याची समस्या भेडसावत आहे. ग्राहकांकडून प्रलंबित वीज बिल देयके (सबसीडीसह) म्हणून ६० हजार कोटींहून अधिक थकबाकी आहे. यापैकी राज्यातील शेतकरी आणि शेतजमीन मालकांची ४२ हजार कोटींची देयके आहेत. वसुली झाल्यास महावितरणला अधिशेष आणि नफा मिळेल, असे सिंघल म्हणाले.


शेतकऱ्यांकडून वसुली करणे कठीण असले तरी त्यांच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे एका वर्षात वापरकर्त्यांकडून २,५०० कोटींची वसुली झाली. फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान आम्ही महावितरणमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक ७६ हजार कोटी जमा केले आहे. तरीही आमची थकबाकी वाढतच आहे. आम्हाला कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ६५ हजार कोटी वापस घ्यावे लागेल, असेही सिंघल म्हणाले.


राज्यावर महावितरणचे ९,१३१ कोटी थकबाकी आहे. याचा वापर जेनकोसची थकबाकी भरण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. महावितरणने ३९ हजार कोटींहून अधिक किमतीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यामध्ये राज्यभरात १.६६ कोटी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ११,१०५ कोटींचा आणि वीज वितरणातील तूट सुमारे ४ टक्के कमी करण्यासाठी १४,२३० कोटी समाविष्ट आहे. ज्यामुळे वार्षिक ४ हजार कोटींचा महसूल मिळेल.

Comments
Add Comment

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई :

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पहाटे अग्नितांडव! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेनंतर बस जळून खाक; एकाचा मृत्यू, ३१ प्रवाशांचा थरारक बचाव

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका

Pune Fire News : धुराचे लोट आणि फटाक्यांचे स्फोट! पिंपरी-चिंचवडमध्ये गजानन रुग्णालयाखाली अग्नितांडव; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

पुणे : पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी आगीची एक मोठी घटना

नववर्षाची पार्टी बेतली जीवावर! ४०० फुट दरीत कोसळलेल्या तरूणाला रेस्क्यू टीमने दिले जीवनदान

सातारा: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्टी आणि सहलीला बाहेर गेले आहेत. पार्टी म्हटल्यावर मद्य आणि मांसाहार,