तळा (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने भातशेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी आपली लावणी आटोपून घेतली होती. लावणीनंतर रोपे वाढण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.
लावणीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात जरी पाऊस सुरू असला तरी रोपांना जगण्यासाठी आधार मिळतो. खोलगट भागात भातशेतीत पाण्याचा ओलावा टिकून रहात असल्यामुळे पाण्याची तेवढी आवश्यकता भासत नाही; परंतु तालुक्यातील बरेचसे शेतकरी व आदिवासी बांधव डोंगर उतारावर शेती करीत असल्याने त्या ठिकाणी पावसाची नितांत आवश्यकता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असल्याने ही भातशेती सुकून करपण्याच्या मार्गावर आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे तळा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. अशातच आता पावसाने दांडी मारल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेती केली आहे, त्या शेतकऱ्यांना आता आपल्या भाताची रोपे करपतात की काय?, अशी चिंता सतावू लागली आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…