Categories: रायगड

पावसाने दांडी मारल्याने भातशेती सुकण्याची भीती

Share

तळा (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने भातशेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी आपली लावणी आटोपून घेतली होती. लावणीनंतर रोपे वाढण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.

लावणीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात जरी पाऊस सुरू असला तरी रोपांना जगण्यासाठी आधार मिळतो. खोलगट भागात भातशेतीत पाण्याचा ओलावा टिकून रहात असल्यामुळे पाण्याची तेवढी आवश्यकता भासत नाही; परंतु तालुक्यातील बरेचसे शेतकरी व आदिवासी बांधव डोंगर उतारावर शेती करीत असल्याने त्या ठिकाणी पावसाची नितांत आवश्यकता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असल्याने ही भातशेती सुकून करपण्याच्या मार्गावर आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे तळा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. अशातच आता पावसाने दांडी मारल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेती केली आहे, त्या शेतकऱ्यांना आता आपल्या भाताची रोपे करपतात की काय?, अशी चिंता सतावू लागली आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

14 seconds ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

4 hours ago