Categories: पालघर

सफाळेतील विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शाळेत भरविला रानभाज्यांचा महोत्सव

Share

सफाळे (वार्ताहर) : पावसाळा सुरू झाला की आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये, डोगंरदरी, कपाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या रानभाज्या उगवू लागतात. या रानभाज्या खूप औषधी असतात. पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या एकदाच उगवत असल्याने कमीत कमी वर्षातून तरी संधी साधून एकदा तरी खाव्यात. खरंतर पालेभाज्या म्हटल्या की बरेच जण नाक मुरडतात परंतु या रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण परिसरात फिरत असताना या बऱ्याचश्या भाज्या आपल्याला दिसत असतात पण आपल्याला यांची नावे माहिती नसतात किंवा प्रत्यक्ष त्याचा अन्नात उपयोग होतो हेही माहिती नसते.

बऱ्याच वेळा या भाज्या पाहिल्या पण ही भाजी कोणती आहे ? आणि ही भाजी आहे का ? हे मुळात कोणाला माहिती नव्हते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाहण्यात व खाण्यात आलेली भाजी विद्यार्थी लगेच त्याचे नाव ओळखतात की, ही भाजी कड्डू आहे किंवा ही भाजी खापरा आहे. अशा विविध भाज्यांची नावे मुले नियमित सांगत असतात. त्यांच्या डब्यामध्ये सुद्धा ह्या भाज्या असतात. ह्या भाज्यांची ओळख अन्य काही मुलांना नसल्याने ती सगळ्या मुलांना व्हावी, त्या भाज्यांचे महत्त्व कळावे ही भाजी कशी बनवतात याविषयी माहिती मिळावी म्हणूनच पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील नवघर शाळेमध्ये रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला होता.

प्रथम परिसरामध्ये होणाऱ्या विविध भाज्यांची विद्यार्थ्यांकडून नावे माहिती करून घेऊन त्यांची एक यादी बनविण्यात आली. सोबतच विशेषतः पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही हिरव्या भाज्यांची नावे मुलांनी सांगितली आणि त्यामुळे त्याही भाज्या या महोत्सवामध्ये शाळेने सामील करून घेतल्या. या रानभाज्या म्हणजे कडडू, लोथी, दिंडे, कंटोली, खापरा, शेवग्याचा पाला, वास्ता, भाजे, टेरी, टाकळा अशा विविध भाज्या महोत्सवात सहभागी करण्यात आल्या. त्यासोबतच अळू, लाल, माठ, मेथी, कारली, भेंडे, कोथिंबीर, चवळी, भाजी, पालक, करडू अशा आणखी विविध भाज्या यात सहभागी करून घेतल्या होत्या.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने या भाज्यांची नावे सांगितली. मुलांनी त्या भाज्या कशा बनवतात याविषयीही माहिती सांगितली. पालकही या मेळाव्याला उपस्थित होते. पालकांनीही या मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला. यातली एक दोन भाजी तर काही पालकांनी पाहिलीही नव्हती. यातील काही भाज्या पालकांनी मुलांकडून खरेदी केल्या आणि मुलांना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला.

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

51 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

2 hours ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामीच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

2 hours ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

2 hours ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

3 hours ago