महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर खा. रामदास तडस बिनविरोध

नवी दिल्ली (हिं.स.) : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा आता वर्धेतील भाजपचे खासदार रामदास तडस यांच्याकडे येणार आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी दोघांनी अपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे तडस यांचा मार्ग मोकळा झाला आहे.


महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार होते. काही दिवसांपासून या संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून खा. रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे.


यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे बरखास्त करण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले होते. आम्ही १४ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते असे तोमर म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडत आहेत.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत