महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर खा. रामदास तडस बिनविरोध

नवी दिल्ली (हिं.स.) : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा आता वर्धेतील भाजपचे खासदार रामदास तडस यांच्याकडे येणार आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी दोघांनी अपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे तडस यांचा मार्ग मोकळा झाला आहे.


महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार होते. काही दिवसांपासून या संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून खा. रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे.


यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे बरखास्त करण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले होते. आम्ही १४ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते असे तोमर म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडत आहेत.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत