अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सुमारे १,७०० गावांना बसला असून, सुमारे ३ लाख ७८ हजार ७५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.


दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर तब्बल ६ लाख २१ हजार ६९४ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.


नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५,३३,३८४ शेतकरी बाधित झाले आहेत. तर २ लाख ९८ हजार ८६१.१७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून १,५७० गावे बाधित झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोली ८५,६०० शेतकरी बाधित झाले आहेत, तर ७६ हजार ७७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ६२ गावे बाधित झाली आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर परभणी असून १,५०० शेतकरी बाधित, १ हजार २०० हेक्टर जमिनीचे नुकसान, तर ३ गावे बाधित झाली आहेत. चौथ्या क्रमांकावर लातूरमध्ये ७७५ शेतकरी बाधित, १ हजार ६४०.५७ हेक्टर जमिनीचे नुकसान, ८ गावे बाधित झाली आहेत.


त्यापाठोपाठ जालन्यात ३७७ शेतकरी बाधित, २५५.७४ हेक्टर जमिनीचे नुकसान, तर एक गाव बाधित झाले आहे. बीडमध्ये ५८ शेतकरी बाधित, २६.८० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून एक गाव बाधित झाले आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील नुकसान नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Comments
Add Comment

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री