अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सुमारे १,७०० गावांना बसला असून, सुमारे ३ लाख ७८ हजार ७५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.


दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर तब्बल ६ लाख २१ हजार ६९४ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.


नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५,३३,३८४ शेतकरी बाधित झाले आहेत. तर २ लाख ९८ हजार ८६१.१७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून १,५७० गावे बाधित झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोली ८५,६०० शेतकरी बाधित झाले आहेत, तर ७६ हजार ७७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ६२ गावे बाधित झाली आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर परभणी असून १,५०० शेतकरी बाधित, १ हजार २०० हेक्टर जमिनीचे नुकसान, तर ३ गावे बाधित झाली आहेत. चौथ्या क्रमांकावर लातूरमध्ये ७७५ शेतकरी बाधित, १ हजार ६४०.५७ हेक्टर जमिनीचे नुकसान, ८ गावे बाधित झाली आहेत.


त्यापाठोपाठ जालन्यात ३७७ शेतकरी बाधित, २५५.७४ हेक्टर जमिनीचे नुकसान, तर एक गाव बाधित झाले आहे. बीडमध्ये ५८ शेतकरी बाधित, २६.८० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून एक गाव बाधित झाले आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील नुकसान नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Comments
Add Comment

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड