अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

  424

औरंगाबाद (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सुमारे १,७०० गावांना बसला असून, सुमारे ३ लाख ७८ हजार ७५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.


दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर तब्बल ६ लाख २१ हजार ६९४ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.


नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५,३३,३८४ शेतकरी बाधित झाले आहेत. तर २ लाख ९८ हजार ८६१.१७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून १,५७० गावे बाधित झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोली ८५,६०० शेतकरी बाधित झाले आहेत, तर ७६ हजार ७७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ६२ गावे बाधित झाली आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर परभणी असून १,५०० शेतकरी बाधित, १ हजार २०० हेक्टर जमिनीचे नुकसान, तर ३ गावे बाधित झाली आहेत. चौथ्या क्रमांकावर लातूरमध्ये ७७५ शेतकरी बाधित, १ हजार ६४०.५७ हेक्टर जमिनीचे नुकसान, ८ गावे बाधित झाली आहेत.


त्यापाठोपाठ जालन्यात ३७७ शेतकरी बाधित, २५५.७४ हेक्टर जमिनीचे नुकसान, तर एक गाव बाधित झाले आहे. बीडमध्ये ५८ शेतकरी बाधित, २६.८० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून एक गाव बाधित झाले आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील नुकसान नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Comments
Add Comment

महाराष्ट्र पोस्टलकडून इंडिया पोस्ट : एक्स्पो सिम्पोजियमचे आयोजन

निर्यातदारांशी संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मुंबई : आंतरराष्ट्रीय पोस्टल (डाक) लॉजिस्टिक्स

Vaishnavi Hagawane Case: गळफास घेतलेल्या पंख्याची आणि साडीची देखील होणार फॉरेन्सिक तपासणी

पुणे: पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सासरच्या होणाऱ्या त्रासामुळे

पर्यावरणाचे रक्षण सर्वांची जबाबदारी

जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मुंबई : देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व

अवकाळी पावसामुळे महिला गृहोद्योगांची गणिते कोलमडली

उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेत कमतरता पोलादपूर (शैलेश पालकर) : यंदा ९ मेपासून अवकाळी पावसाने

सामोडे चौफुलीवर पाण्यासाठी रास्ता रोको

पिंपळनेर : ऐन उन्हाळ्यात सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे

सोमवारपासून अभयारण्यात पक्षांच्या गणनेस सुरुवात

कर्नाळा परिसरात आज पर्यटकांना प्रवेश बंदी पनवेल : बौद्धपौर्णिमेच्या रात्री कर्नाळा पक्षी अभयारण्यात