बनावट दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, १० अटकेत

Share

अहमदाबाद : गुजरातमधील बोताड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू पिऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात दारूबंदी असतानाही बनावट दारू विक्री प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण रुग्णालयात दाखल आहेत.

गुजरातच्या होताडमधील रोजित गावात रविवारी झालेल्या या घटनेनंतर सोमवारी प्रशासनाने याची दखल घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोताडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३० जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतांश जण भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या दुर्घटनेचे वृत्त गांधीनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोताडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

21 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

51 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago