वर्षा ऋतूत माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

माथेरान (वार्ताहर) : मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळचे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणजे अर्थातच माथेरान असल्यामुळे या वर्षा ऋतूत दर शनिवार आणि रविवार सुट्ट्यांच्या दिवशी तर पर्यटकांची अक्षरशः मांदियाळी दिसत असून या दिवसांत इथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले पाहावयास मिळत आहे.


मुंबई पुण्यावरून येताना नेरळ रेल्वे स्टेशनमध्ये उतरल्यावर माथेरानला येण्यासाठी नेरळ ते माथेरान दरम्यान मिनिट्रेन सेवा पावसाळ्यात चार महिने बंद करण्यात येते. त्यामुळेच सात किलोमीटरच्या या मनमोहक घाटरस्त्याच्या सुखद प्रवासासाठी टॅक्सीच्या साहाय्याने माथेरान गाठता येते. दस्तुरी नाका येथे उतरल्यावर काही अंतरावर अमन लॉज रेल्वे स्टेशनवरून गावात जाण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा बाराही महिने उपलब्ध असते. आपल्या खिशाला परवडणारे खर्चिक हौशी पर्यटक घोड्यावरून तर आबालवृद्ध मंडळी हातरीक्षाचा आधार घेऊन येत असतात.


डोंगरांचे नयनरम्य देखावे मनाला भुरळ घालतात त्यामुळेच शटल सेवेच्या प्रवासात सर्व मरगळ, थकवा निघून जातो. माथेरान स्टेशनवर आल्यावर आपले हॉटेल अथवा लॉज निश्चित केल्यानंतर भटकंतीसाठी महत्त्वाचे जवळपास दहा ते पंधरा पॉइंटस पाहण्याजोगे आहेत. त्यावरून नैसर्गिक देखावे न्याहाळत असताना खरोखरच तहानभूक हरवून जाते आणि नकळत आपण निसर्गाच्या सान्निध्यात एकरूप होऊन जातो. एखाद्या पॉइंटवरून निसर्गाचा नजारा न्याहाळताना गर्द धुक्याच्या लोटांमुळे अनेकदा समोरचे दृश्य डोळ्यांनी दिसत नाही; परंतु हे धुके हळूहळू लोप पावल्यावर समोर दिसणाऱ्या डोंगररांगा आणि त्यावरून मुक्तपणे उंचीवरून पडणारे शुभ्र जलप्रपात, संपूर्ण डोंगर न्हाऊन निघाल्यामुळे हिरवा शालू परिधान केलेले डोंगर अन वाऱ्यांची झुळूक, मध्येच येणारे रिमझिम पावसाचे थेंब अंगावर रोमांच उभे करतात.


माथेरानचा एकंदरीत परिसर हा १६७० एकरांत ५२ किलोमीटर मध्ये वसलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे पॉइंटस पाहण्यासाठी निदान दोन दिवसांचा मुक्काम असणे आवश्यक आहे. अनेक पर्यटक पायी चालत इथल्या निसर्गाच्या सानिध्यात वावरताना दिसतात. या ठिकाणी पावसाळी धबधबे नाहीत त्यामुळे अनेकदा पर्यटक येथील शारलोट लेकच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद घेतात.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग