Categories: पालघर

तलासरीत अपघातप्रवण क्षेत्रात अपघातांत दिवसेंदिवस वाढ

Share

तलासरी (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ अपघातप्रवण क्षेत्र असून या अपघातप्रवण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अपघात होऊन यात अनेक बळी गेलेले असून मोठ्या संख्येने लोक जायबंदी होत आहेत. अच्छाड येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात बारा आदिवासी मुली गंभीर जखमी झाल्या. अच्छाड येथे औद्योगिक क्षेत्र असून सकाळ-संध्याकाळ येथे कामगारांना घेऊन येणारी जाणारी वाहने मोठ्या संख्येत असतात त्याना महामार्ग ओलांडावा लागतो. पण याच वेळी महामार्गांवर भरधाव वाहनेही जात असतात. त्यामुळे येथे नियमित अपघात होतात.

अच्छाड येथे असलेल्या अपघातप्रवण क्षेत्रात आतापर्यंत ३४ अपघात होऊन यात ३० इसमांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी भुयारी मार्ग किव्हा उड्डाणपूल बांधावा, याबाबत तलासरी पोलिसांनी अनेक वेळा भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांना पत्र दिले. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. येथे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे खासदार राजेंद्र गावित यांनी या अपघातप्रवण क्षेत्र येथे भेट देऊन उड्डाणंपुलाची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी ती मान्य केली व या ठिकाणी तसेच तलासरीजवळील अन्य दोन ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. पण या उड्डाणपुलांच्या बांधकामाला अजून मुहूर्त मिळाला नसल्याने पुलांचे काम रखडले असल्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. पण अजून बळी गेल्यावर प्राधिकरण पुलांचे काम सुरू करणार का?, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत महामार्गांवर अपघातप्रवण क्षेत्राबरोबर महामार्गवरील हॉटेलमध्ये जाण्यासाठी अनधिकृत कटही मोठ्या प्रमाणात आहेत. या अनधिकृत कटवरून रस्ता ओलांडताना अपघातात आदिवासी लोकांचे मृत्यू होत आहेत. पण या अनिधिकृत कटकडेही प्राधिकरणाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. महामार्गांवर अच्छाड नवकार, काजली चाणक्य नगरी, वरवाडा, आरोमा हॉटेल, सूत्रकार फाटा, वडवली निलगिरी हॉटेल, वडवली शिवम शोरूम, आरटीओ चेक पोस्ट, दापचरी रबर बोर्ड ही नऊ ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र असून येथे वारंवार अपघात होतात. हे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तलासरी पोलिसांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्राधिकरणाला याकडे गांभीर्याने बघायला वेळ नाही, हे आदिवासी जनतेचे दुर्दैव आहे.

Recent Posts

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

16 minutes ago

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

21 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

44 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

46 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago