तलासरीत अपघातप्रवण क्षेत्रात अपघातांत दिवसेंदिवस वाढ

  116

तलासरी (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ अपघातप्रवण क्षेत्र असून या अपघातप्रवण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अपघात होऊन यात अनेक बळी गेलेले असून मोठ्या संख्येने लोक जायबंदी होत आहेत. अच्छाड येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात बारा आदिवासी मुली गंभीर जखमी झाल्या. अच्छाड येथे औद्योगिक क्षेत्र असून सकाळ-संध्याकाळ येथे कामगारांना घेऊन येणारी जाणारी वाहने मोठ्या संख्येत असतात त्याना महामार्ग ओलांडावा लागतो. पण याच वेळी महामार्गांवर भरधाव वाहनेही जात असतात. त्यामुळे येथे नियमित अपघात होतात.


अच्छाड येथे असलेल्या अपघातप्रवण क्षेत्रात आतापर्यंत ३४ अपघात होऊन यात ३० इसमांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी भुयारी मार्ग किव्हा उड्डाणपूल बांधावा, याबाबत तलासरी पोलिसांनी अनेक वेळा भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांना पत्र दिले. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. येथे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे खासदार राजेंद्र गावित यांनी या अपघातप्रवण क्षेत्र येथे भेट देऊन उड्डाणंपुलाची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी ती मान्य केली व या ठिकाणी तसेच तलासरीजवळील अन्य दोन ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. पण या उड्डाणपुलांच्या बांधकामाला अजून मुहूर्त मिळाला नसल्याने पुलांचे काम रखडले असल्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. पण अजून बळी गेल्यावर प्राधिकरण पुलांचे काम सुरू करणार का?, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.


तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत महामार्गांवर अपघातप्रवण क्षेत्राबरोबर महामार्गवरील हॉटेलमध्ये जाण्यासाठी अनधिकृत कटही मोठ्या प्रमाणात आहेत. या अनधिकृत कटवरून रस्ता ओलांडताना अपघातात आदिवासी लोकांचे मृत्यू होत आहेत. पण या अनिधिकृत कटकडेही प्राधिकरणाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. महामार्गांवर अच्छाड नवकार, काजली चाणक्य नगरी, वरवाडा, आरोमा हॉटेल, सूत्रकार फाटा, वडवली निलगिरी हॉटेल, वडवली शिवम शोरूम, आरटीओ चेक पोस्ट, दापचरी रबर बोर्ड ही नऊ ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र असून येथे वारंवार अपघात होतात. हे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तलासरी पोलिसांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्राधिकरणाला याकडे गांभीर्याने बघायला वेळ नाही, हे आदिवासी जनतेचे दुर्दैव आहे.

Comments
Add Comment

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील