दांडी गावात मुले पळवण्याच्या संशयावरून खळबळ

संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात


बोईसर : पालघर तालुक्यातील दांडी गावात मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयावरून ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. मात्र, पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संशयितांना ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ रोखण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी सकाळी दांडी गावात एका रिक्षामधून दोन पुरुष आणि एक महिला ब्लँकेट विकण्यासाठी आले होते.


ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे असताना, हे अनोळखी लोक आपल्या मोबाईलमधून शाळकरी मुलींचे गुपचूप फोटो काढत असल्याचा संशय काही मुलींना आला. मुलींनी ही माहिती तातडीने आपल्या पालकांना दिली. गावकऱ्यांनी या संशयित व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये लहान मुलींचे फोटो आढळले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि 'मुले पळवणारी टोळी' आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता ग्रामस्थांचा मोठा जमाव तिथे गोळा झाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच जागरूक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सातपाटीचे पोलीस निरीक्षक उदय सुर्वे आणि तारापूरचे पोलीस निरीक्षक निवास कणसे आपल्या पथकासह तातडीने दांडी गावात दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढली आणि त्या तीन संशयित व्यक्तींना आपल्या ताब्यात घेतले.


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून कारवाई केल्यामुळे जमावाचा रोष शांत झाला. सध्या पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत. "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना कळवा," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या