माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यासाठी हालचालींना वेग

माथेरान (वार्ताहर) : माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून श्रमिकांच्या कष्टावर सुरू असणाऱ्या हातरिक्षा कायमस्वरूपी हद्दपार होऊन येथील श्रमिकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी आणि आधुनिक युगाप्रमाणे व्यवसायाभिमुख रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षांची नितांत आवश्यकता आहे. तेव्हाच हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ नावारूपाला येऊ शकते.


याच ई-रिक्षांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पर्यटन क्रांती घडू शकते. या कामी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदेंनी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा अखंडपणे सुरू ठेवला होता. त्यास यश मिळाले असून, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला सूचित केले आहे.


माथेरानच्या शहरासाठी आणि भविष्यासाठी महत्त्वाच्या निर्णयामधील, एक टप्पा प्रत्यक्ष चाचणी दिवशी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयाच्या अधीन राहून, सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता सानियंत्रण समिती, सर्व सदस्य आणि माथेरान गिरिस्थान नगर परिषद करत आहे आणि माथेरानच्या दृष्टीने गेली कितीतरी वर्ष प्रलंबित या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे. - सुरेखा भणगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी


ई-रिक्षा सुरू करण्यासाठी राज्य सरकार कोणते प्रयत्न करीत असल्याचे न्यायाधीश नागेश्वर राव यांनी विचारले असता, राज्य सरकारचे वकील राहुल चिटणीस यांनी राज्य सरकार तीन महिने वेगवेगळ्या मॉडेल्सची चाचणी करून, योग्य त्या रिक्षांना परवानगी देणार असल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे. - सुनिल शिंदे, याचिकाकर्ते

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग