दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुरुड येथे समुद्राला आलेल्या उधाणामुळे येथील बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुरूबन, नारळ, पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
समुद्र किनाऱ्यालगत धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राचे पाणी बागायतींमध्ये जात आहे. या उधाणामुळे मोठे नुकसान होत आहे. याबाबत येथील बागायतदारांनी मेरीटाईम बोर्डाला कळवले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी येथील बागायतदार मागणी करत आहेत. दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या भरतीवेळी हे पाणी चक्क बागेत घुसते.
या ठिकाणी बंधारा आवश्यक आहे. तशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप येथील बागायतदार करत आहेत.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…