वाढदिवस साजरा होताना नेहमीच नव्या जबाबदारीची जाणीव होते : खासदार नारायण राणे

उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती


रत्नागिरी : वाढदिवस साजरा होत असताना मला नेहमी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादातून नव्या जबाबदारीची जाणीव होत असते आणि यातूनच नवे काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केले. देवरुख येथील मराठा मंदिर येथे महायुतीच्यावतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते खासदार नारायण राणे बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर सौ. निलमताई राणे, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.



खा. राणे म्हणाले आजची गर्दी पाहून मी भारावून गेलो आहे. मराठी माणसासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वयाच्या पंधराव्या वर्षी सदस्य झालो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला घडवलं, प्रेम दिलं त्यांच्यामुळे राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली. आजपर्यंत ११ पदांवर काम केले आहे. पण या पदांमुळे जमिनीशी, तुमच्याशी असलेली नाळ तोडली नाही, सत्ता येते आणि जाते त्यामुळे या पदांमुळे माझ्यात फारसा फरक पडला नाही. या पदांपेक्षाही तुम्हा सगळ्यांना भेटलं, तुमच्या सुखदुःखांना जाणून घेतलं, तुमच्याशी प्रेमाने चार शब्द बोललो हीच माझ्यासाठी प्रेरणा आणि ताकद असते, असे खा. राणे म्हणाले.



आज माझ्या वाढदिवसानिमित्त महायुतीचे सर्वच नेते या व्यासपीठावर एकत्र आले आहेत तसंच कोकणच्या विकासासाठी सुद्धा आपण सर्वजण एका व्यासपीठावर येत एकत्रितपणे काम करूया, असं आवाहन सुद्धा खा. राणे यांनी केले. आज तुम्ही सगळेजण मला दादा म्हणता, मान सन्मान देता पण नारायण राणे घडण्यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्याचे हात, तुमचे विचार, साथ सोबत होती म्हणून मी घडत गेलो, हे मी कधीच विसरू शकत नाही असेही खा. राणे यांनी आवर्जून सांगितले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ व्यापाराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख करत जिल्ह्याला यातून मुक्त केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी आपले मनोगत संपवताना केव्हाही कुठल्याही मदतीला मला हाक मारा, मी ओ दिल्याशिवाय राहणार नाही अशी साद सुद्धा त्यांनी उपस्थित सर्वांना दिली. खा राणे यांच्या या प्रत्येक शब्दाला उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली.

Comments
Add Comment

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

FIFA WORLDCUP : फुटबॉल इतिहासातील अविश्वसनीय विक्रम... ऐकून थक्क व्हाल!

फुटबॉलची जागतिक पंढरी मानल्या जाणाऱ्या 'फिफा विश्वचषका'चा (FIFA World Cup) इतिहास अत्यंत गौरवशाली आणि रहस्यांनी भरलेला

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली