धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची हत्या

  114

मुंबई (हिं.स.) : एका २६ वर्षीय प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टम्प घालून हत्या झाल्याची घटना धारावीत घडली आहे. विमल राज नाडार असे त्याचे नाव असून तो धारावीतील एका चाळीत राहत होता. या घटनेनंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय आरोपी मालेश चिताकांडी आणि विमल एकाच चाळीत राहत होते. काही कारणांमुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. त्यामुळे सतत त्यांच्यात काही ना काही कारणांमुळे खटके उडायचे. त्यादिवशीही घराबाहेर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे त्यांच्यात वाद झाले. त्या रागातून त्याने विमलला एका ठिकाणी गाठून त्याच्या डोक्यात स्टम्प घातला. या हल्ल्यानंतर विमल जागीच कोसळला. बराच वेळानंतर त्याला तेथील स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत