राज्यात सत्तांतर झाले ते फक्त जनतेसाठी – फडणवीस

Share

पनवेल : राज्यात सत्तांतर झाले ते फक्त जनतेसाठी, हे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा… हे सरकार यावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, असे भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेल येथे पार पडत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ”महाराष्ट्राच्या रयतेचे राज्य आल्यानंतर भाजपची पहिली कार्यकारिणी रायगड जिल्ह्यात होत आहे याचा मला अभिमान आहे. राज्यातील सत्तेचा गड आपण जरी जिंकलो असलो तरी मोदींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे त्या यात्रेतील गड जिंकल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीने सूडाचं राजकारण केलं आहे. हे वर्षे खूप संघर्षाचे गेले आणि या अडीत वर्षात महाराष्ट्र खूप मागे गेला, प्रगतीची सर्व कामे थांबली गेली, केंद्राने कोट्यावधी रूपये दिली ते काम मागच्या सरकारने बंद केले पण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही.. त्यामुळे राज्यात हे सत्तांतर झाले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे.” असा दावा फडणवीसांनी केला.

“राज्यात पहिल्यांदाच सत्तेतील ४० आमदार सत्ता सोडून विरोधी पक्षात येत आहेत. कारण त्यांना माहिती होते की आपण येथे राहिलो तर संपणार आहोत. कारण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत होतं हे त्यांना कळलं होतं आणि सरकारमधून मावळे बाहेर पडले. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता आमच्यासोबत जे आले तीच खरी शिवसेना आहे.” असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.

मला नेत्यांनी सेनापती बनवलं आणि माझ्यामाहे भक्कमपणे उभे राहिले आणि हे जनतेचं सरकार स्थापन झालं. मला जेष्ठांनी मला उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला लावली हा माझा सन्मान आहे. मला सरकारमध्ये राहून सरकार चालवा असं त्यांनी सांगितलं. आता मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

25 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

37 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

1 hour ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

1 hour ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

2 hours ago